जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरीला पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण आटल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणाची पाणीसाठा क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून सध्या धरणात १२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यात गाळाचे प्रमाण भरपूर आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले, मात्र धरणात काहीच पाणी आले नाही. नळाला आठवड्यातून फक्त दोनच दिवस गाळमिश्रित पाणी येत असल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे, पुरंदर तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असून दुष्काळाची चिन्हे आहेत. जेजुरीच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जेजुरी एमआयडीसीमधून शहराला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तसे आदेश दिले होते.

जेजुरीच्या पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यासाठी माजी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी विशेष प्रयत्न केल्याने एमआयडीसीचे पाणी जेजुरीला द्यावे हा मार्ग निघाला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामतीचे कार्यकारी अभियंता यांचेकडून जेजुरी नगरपालिकेला पाणी देण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे पत्र आले आहे. महामंडळाबरोबर पाणीपुरवठा करारनामा करून नळजोड घ्यावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. जेजुरीचा खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने येथे दररोज हजारो भाविक देवदर्शनासाठी येतात, त्यांनाही लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता नव्या निर्णयामुळे एमआयडीसीचे पाणी जेजुरीकरांना मिळणार असल्याने नागरिकांबरोबर भाविकांचाही पाणी प्रश्न काही अंशी सुटणार आहे.

10000 residents of Swapnpurti housing complex in Kharghar faced insufficient water supply for eight days
खारघरमधील स्वप्नपूर्ती संकुलात अपुरा पाणीपुरवठा
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
Water supply to Kalyan-Dombivli towns will be closed on Tuesday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
Water supply to Kalyan East and West cities will be shut off on Tuesday from 10 am to 4 pm
कल्याण शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
Seven million cubic meters of water from Ulhas River is reserved for Ambernath and Badlapur
बदलापूर, अंबरनाथला मिळणार अतिरिक्त पाणी उल्हास नदीतून आरक्षण मंजूर, योजना मार्गी लागणार
water supply in Navi Mumbai, Navi Mumbai water,
नवी मुंबईत शुक्रवारी सकाळीही पाणीपुरवठा नाही
no water supply tomorrow in some parts of Thane city
ठाण्याच्या काही भागात उद्या पाणी नाही
Mumbai currey road water supply marathi news
मुंबई: करी रोड आणि आसपासच्या परिसरात २७ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद, पाणी काटकसरीने वापरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन

जेजुरीला नाझरे धरण व वीर धरणाच्या जवळील मांडकी डोहातून पाणीपुरवठा होत होता, नाझरे धरणातील पाणीसाठा संपला तर वीर धरणाच्या भिंतीलगत असलेल्या मांडकी डोहातून येणारी पाण्याची पाईपलाईन पुणे- पंढरपूर महामार्ग करताना काढण्यात आली, यामुळे जेजुरी पालिकेला दोन्हीकडून पाण्याची अडचण निर्माण झाली. वीर धरणातून जेजुरी औद्योगिक वसाहतीला रोज पाणीपुरवठा केला जातो, याच पाईपलाईनद्वारे जेजुरीला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पाण्याचे बिल नगरपालिकेला भरावे लागणार

जेजुरी नगरपालिकेने एमआयडीसी कडे एक दिसाड 2000 क्युबिक मीटर पाण्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे तत्वता मंजुरी मिळाली आहे .योग्य दर निश्चित करून नगरपालिका हे पाणी बिल भरणार आहे, रस्त्याच्या कामासाठी काढण्यात आलेली पाईपलाईन पण जोडण्यात येऊन त्यातूनही शहराला पाणीपुरवठा केला जाईल,पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपालिका गांभीर्याने उपाय योजना करीत आहे,अशी माहिती मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी दिली.