अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केल्याचं समोर आलं आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली होती. पण, आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची शिवाजी महाराजांबरोबर तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रकरण काय?

शिवसेनेकडून ( शिंदे गट ) एक बँनर लावण्यात आलं आहे. या बँनरवर ‘३५० वर्षानंतर… पुन्हा तोच योग’ या आशयाच्या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना दाखवण्यात आलं आहे. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे हे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवलं आहे.

bjp pradipsinh Jadeja marathi news
अजितदादांच्या बालेकिल्ल्यावर गुजरात भाजपच्या नेत्याची नजर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
amol kolhe on pm narendra modi
Amol Kolhe: “पुतळ्यानं स्वतःहूनच मान टाकली…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनाम्यानंतर डॉ. अमोल कोल्हेंची कवितेमधून प्रतिक्रिया
ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”

हेही वाचा : नितेश राणेंनी राहुल गांधींची दाऊदबरोबर केली तुलना; म्हणाले, “पाकिस्तान अन्…”

यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत ‘अरे काय चालू आहे महाराष्ट्रात,’ असा सवाल विचारला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “तुलना तर सोडाच… थेट छत्रपती शिवाजी महाराजच… अरे काय चालू आहे, महाराष्ट्रात. विद्रुपीकरण एका ऐतिहासिक घटनेचं. ते पण इतकं,” अशी संतप्त भावना आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंचा काँग्रेस, ठाकरे गटावर आरोप; म्हणाले…

“अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा”

मनसे आमदार राजू पाटील यांनीही यावरून टीका केली आहे. “कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही, तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा,” असा सल्ला राजू पाटील यांनी दिला आहे.