कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कोल्हापुरातील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेरो-शायरीच्या माध्यमातून टीका केली होती. याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला लावणाऱ्यांची लायकी काय? असं टीकास्र जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सोडलं आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“मेरी कोई खता तो साबीत कर, बुरे है तो बरा साबीत कर, तुझे चाहा है, कितना तू क्या जाने, चल हम बेवाफा ही सही, तू अपनी वफा तो साबीत कर,” असा थेट हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला होता.

sanjay shinde who killed akshay shinde in an encounter get discharged from hospital
अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करणाऱ्या संजय शिंदे यांना डिस्चार्ज
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
MP supriya sule criticize deputy cm ajit pawar in pimpri chinchwad
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला… म्हणाल्या, “पिंपरी- चिंचवडचा कारभारी वेगळा होता म्हणून…”
manoj jarage patil pc
“देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी, त्यानंतर…”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!
laxman hake criticized sharad pawar
Laxman Hake : “शरद पवार हे महाजातीयवादी नेते”, आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांची टीका; म्हणाले, “पवार कुटुंबातील व्यक्ती…”

हेही वाचा : “विखे-पाटलांबरोबर यशोमती ठाकूरही भाजपात प्रवेश करणार होत्या, पण…”, रवी राणांचा मोठा दावा

यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शायरीच्या माध्यमातून शरद पवार यांना आव्हान देण्यात आलं की, तुम्ही इमानदार आहात, हे सिद्ध करा. यांना शायरी किती समजते, हे मला माहिती नाही. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला सांगण्याएवढी तुमची लायकी आहे का?”

“हातवारे करून शायरी म्हणायला मजा येते. पण, शरद पवारांना इमानदारी सिद्ध करायला महाराष्ट्र पडला आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

हेही वाचा : VIDEO : “देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना जरांगे-पाटलांकडे पाठवलं असेल, तर…”, जयंत पाटलांचा टोला

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी कोल्हापूरात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. “एकीकडं लोकशाही आणि स्वाभिमानाची ग्वाही द्यायची. ज्यांनी तुमच्याबरोबर हयात घालवली त्यांच्यावर बोलायचं. तुम्ही जीव द्यायला लावला असता, तर दिला असता. पण, काही जणांचे मतदारसंघ सांभाळायचे म्हणून असा दुर्दैवी निर्णय घेतला,” अशी टीका धनंजय मुंडेंनी शरद पवार यांच्यावर केली.