गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मागील आठवड्यात आव्हाडांवर अवघ्या ७२ तासांच्या आत दोन गंभीर गुन्हे दाखल झाले होते. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडल्याप्रकरणी आव्हाडांवर पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ७२ तासांच्या आत आव्हाडांवर विनयभंगाचाही गुन्हा दाखल झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असलेल्या ठिकाणी गर्दीत आव्हाडांनी एका महिलेचा विनयभंग केला, असा आरोप पीडित महिलेनं केला होता. या दोन्ही प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना जामीन मिळाला आहे. मात्र, या दोन गुन्ह्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. संबंधित दोन्ही गुन्हे खोटे असून राजकीय दबावापोटी पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केला, असा पुनरुच्चार आव्हाडांनी केला आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Cecile Richards personality
व्यक्तिवेध : सीसिल रिचर्ड्स
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका
NCPs MLA from Wai Makarand Jadhav appointed as Guardian Minister of Buldhana
बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी
challenge for new guardian minister pankaj bhoyar is to manage equal colleagues
नव्या पालकमंत्र्यास समतुल्य सहकारी सांभाळण्याचेच आव्हान

हेही वाचा- Sharaddha Murder Case: तपास CBI कडे सोपवणार? युक्तीवादात दिल्ली पोलीस म्हणाले, “८० टक्के…”

माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात गेलो, तर तेव्हा त्याचा नाहक त्रास पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. पण त्या गरिबांचा काहीच दोष नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची बाजू घेतली आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांचा दोष काय असा प्रश्न उपस्थित करत या अधिकाऱ्यांना ठाण्यात आदेश कोण देते, हे महाराष्ट्राला माहीत असल्याचा पुरुच्चार त्यांनी केला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना ठाण्यात आदेश देणारी ती व्यक्ती कोण अशी चर्चा यानिमित्ताने शहरात सुरु झाली आहे.

आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, मागील आठवड्यात ७२ तासांत माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांविरुद्ध उद्या मी कोर्टात जाईन, तेव्हा त्याचा नाहक त्रास पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा याच्यात काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात. म्हणजे यामध्ये हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरिष्ठ अधिकारी हात वर करून मोकळे होतील. त्यामुळे काय करावं हे सुचत नाही. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवावं कि वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचाही यामध्ये काही दोष नाही, आदेश कुठून आले? हे महाराष्ट्राला माहीत आहे, असंही आव्हाड म्हणाले.

Story img Loader