मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. बीडमधील सभेत बोलताना मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं होतं. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले होते. मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मला विधानपरिषदेवर पाठवा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल्याचा दावा हसन मुश्रीफांना केला होता. याला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“ठाण्यात एकदा आव्हाडांवर गुन्हा झाला होता. तेव्हा अजित पवार विरोधी पक्षनेते होते. अजित पवार आणि जयंत पाटलांना घेऊन आव्हाड अध्यक्षांच्या दालनात गेले. तिथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. तेव्हा आव्हाड फडणवीसांच्या पाया पडाले आणि म्हणाले, ‘मी आता विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मला विधानपरिषदेवर पाठवा’,” असा गौप्यस्फोट हसन मुश्रीफांनी केला होता.

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

हेही वाचा : “पंतप्रधानांना राखी बांधली अन् ईडी थांबली”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळी प्रत्युत्तर देत म्हणाल्या…

“हे तुम्हाला सांगणारा मुर्ख कोण आहे?”

यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, “मी टीकेला घाबरत नाही. मी फडणवीसांच्या पाया पडल्या, असं मुश्रीफांनी सांगितलं. हे तुम्हाला सांगणारा मुर्ख कोण आहे? जयंत पाटलांनी तुम्हाला हे सांगितलं नाही. जयंत पाटलांचं तुम्ही नाव घेत असाल, तर त्यांनी तुम्हाला एका प्रकरणात मदत केली आहे. त्या प्रकरणात मदत करणारा कोणाचा माणूस होता, हे एकदा विचारून घ्या…. ती मदत किती मोठी होती, याची कल्पना तुम्हाला आहे.”

“मला विधानपरिषदेचा आमदार करा, असं मी म्हणालो, पण…”

“तेव्हा आपण एकत्र यायला पाहिजे, अशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं, मी येऊ शकत नाही. कारण, मी विचारधारा सोडणार नाही. तसेच असेल मला विधानपरिषदेचा आमदार करा, असं मी म्हणालो. पण, पाया पडलो नाही. कोणाचीही शपथ घेऊन मुश्रीफांनी हे घडलं असल्याचं सांगावं. कशाला खोटं बोलता. आयुष्यभर खोटेच बोलत आलात,” अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी मुश्रीफांवर केली आहे.

हेही वाचा : “दाढीवाल्याने भाजपाची पावडर लावली”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…

“…तर मी कोणाच्याही बापाचं ऐकत नाही”

“रुग्णांच्या नावावर करोडो रुपयांची मुश्रीफांनी कमाई केली आहे. माझे तोंड उघडायला लावू नका. माझ्यावर टीका केली, तर त्याहून अधिक विषारी टीका मी तुमच्यावर करणार. माझी चूक नसेल, तर मी कोणाच्याही बापाचं ऐकत नाही. मी फक्त आई-वडील आणि शरद पवारांच्या पाया पडतो. ज्याच्याबरोबर आहे, त्याच्याबरोबर मरेपर्यंत राहणार आहे. अर्ध्यातून पळून जाणारा नाही,” असे म्हणत आव्हाडांनी मुश्रीफांना डिवचलं आहे.

Story img Loader