उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा करणार आहेत. सध्या या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे. मतदारसंघात अजित पवार समर्थक आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचे होर्डिंग्स लावले आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केलं आहे. अजित पवार म्हणाले, “आगामी निवडणुकीत माझ्याविरोधात प्रचार केला जाईल, त्याला बारामतीच्या जनतेनं उत्तर द्यावं.” तसेच अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीकाही केली. त्यांनी पक्षाचा अध्यक्ष होण्यापासून वंचित ठेवल्याचा दावा केला. यावर आता शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते अजित पवार यांना उद्देशून म्हणाले, तुम्हाला अधिकृतरित्या पक्षाचे अध्यक्ष होण्यापासून कोणी वंचित ठेवलं होतं? तुम्ही आजवर पक्षाच्या कुठल्या आंदोलनात सहभागी झालात? पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमात सहभागी झालात? आपण फक्त सत्तेसाठी जन्माला आलो आहोत असे वागत आला आहात.” जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार यांनी रस्त्यावर उतरून एखादं आंदोलन केलंय का? त्यांनी असं आंदोलन केलं असेल तर ते दाखवावं. आंदोलन केल्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर एकतरी गुन्हा दाखल झाला आहे का? त्यांच्यावर कुठला खटला चालू आहे का? त्यांनी फक्त शरद पवारांचं नाव वापरून सत्तेचं राजकारण केलं आहे.

no alt text set
Union Budget 2025 : पेट्रोल-डिझेल होणार का स्वस्त? अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वसामान्यांचे लक्ष; जाणून घ्या आजचे नवीन दर
historic tiger claws of Chhatrapati Shivaji Maharaj left the Satara museum for Nagpur on Friday 31st
ऐतिहासिक वाघनखे नागपूरला रवाना
Expectations have risen in the textile industry the countrys second largest business with the budget announcement
आजच्या अर्थसंकल्पाकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष, निर्यात परतावा कर, जीएसटी आकारणी, कर्ज पुरवठ्याबाबत अपेक्षा
Mid Day Meal
Mid-Day Meal : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व देण्याचा पर्याय; शालेय शिक्षण विभागाची माहिती
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”

जितेंद्र आव्हाड अजित पवारांना म्हणाले, तुम्ही शरद पवारांच्या रक्ताचे नसलात तरी तुम्ही नेहमीच त्यांच्या रक्तात होता. म्हणूनच तुम्ही इतकी महत्त्वाची खाती सांभाळलीत, इतकी मंत्रिपदं भूषवली. तुमची वादग्रस्त वक्तव्ये, तुमच्या चुका या पक्षासाठी घातक होत्या, तरीदेखील शरद पवारांनी त्या पाठीशी घातल्या, पोटात घेतल्या आणि तीच शरद पवारांची मोठी चूक होती. तुम्ही कुठे काय बोललात, धरणात ### गेलात, या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. याच चुका जितेंद्र आव्हाडने केल्या असत्या तर शरद पवारांनी त्याला पक्षात ठेवलं असतं का?

हे ही वाचा >> “माझं येणं आणि नारायण राणेंचं जाणं…”, अशोक चव्हाणांनी सांगितली भाजपाची निवडणुकीची योजना

आव्हाड अजित पवारांना उद्देशून म्हणाले, तुम्ही उठता-बसता मला शिव्या देता. परंतु, मी तुमच्यासारख्या चुका केल्या असत्या तर शरद पवारांनी मला केव्हाच पक्षातून हाकललं असतं. तुम्ही पक्षात काय-काय कुरघोड्या करत होतात, आमच्याबद्दल शरद पवारांना खोटंनाटं सांगत होतात. कारण तुम्हाला तेवढेच धंदे होते.

Story img Loader