मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र हे ऐच्छिक रक्तदानात देशात प्रथम क्रमांक टिकवून आहे. ज्या ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’च्या (एसबीटीसी) माध्यमातून ही कामगिरी होते त्या ‘एसबीटीसी’मध्ये आज पूर्णवेळ सहाय्यक संचालक नाहीत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांची पदे भरून नव्याने बळकटीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे जे.जे. महानगर रक्तपेढीची दूरावस्था झाली असून तेथे रक्तसंकलनापासून रक्तसाठवणूक व विलगीकरणासाठी अनेक उपकरणांची आवश्यकता असताना या रक्तपेढीच्या अडचणींकडे पाहण्यास उच्चदस्थांना वेळ नसल्याची खंत रक्तपेढीतील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वेळीच रक्तपेढीसाठी आवश्यक ती उपकरणे व अन्य साधने न दिल्यास भविष्यात सुरक्षित रक्तपुरठ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भितीही येथील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा