निवडणूक आयोगानं कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. संबंधित दोन्ही मतदारसंघात २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक पार पडणार आहे. या जागांवरून आता महाविकास आघाडीमध्ये धूसपूस सुरू झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष असून जागा दोनच आहेत. त्यामुळे संबंधित जागा कोणत्या पक्षांना मिळणार यावरून पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसबा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल, असं विधान केलं आहे. तसेच कसब्यातील जागेसाठी काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे, असंही नाना पटोले म्हणाले. त्यामुळे ही जागा कोण लढवणार? यावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
बलात्काराच्या आरोपांवरून काँग्रेसच्या खासदाराला अटक; कोण आहेत राकेश राठोड? (फोटो सौजन्य पीटीआय)
बलात्काराच्या आरोपांवरून काँग्रेसच्या खासदाराला अटक; कोण आहेत राकेश राठोड?
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
BJP vs Congress which political party has bigger bank balance
BJP vs Congress : भाजपा आणि काँग्रेस… दोन्ही पक्षांच्या बँक बॅलन्समध्ये नेमका फरक किती? निवडणूक आयोगाच्या डेटामधून समोर आली माहिती

हेही वाचा- “शरद पवारांनी उचललेल्या पावलाचा अर्थ कळण्यास…”, पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक विधानापासून जयंत पाटलांचा यू-टर्न

नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित जागेबाबत तिन्ही पक्ष चर्चा करतील, त्यानंतर ती जागा कोणत्या पक्षाला द्यायची, हे ठरवलं जाईल, असं विधान जाधव यांनी केलं. ते रत्नागिरी येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना सल्ला; म्हणाले, “स्वत:चं नुकसान…”

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले, “नाना पटोले हे एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचं विधान गांभीर्याने कसं घेता येणार नाही. पण जो निर्णय होईल, तो तीन पक्ष मिळून महाविकास आघाडी म्हणून घेतील. कोणती जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेनं लढवायची? हे महाविकास आघाडी म्हणून ठरवलं जाईल. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने दावा जरी केला असला तरी निर्णय एकत्रितपणे होईल, कारण जागा दोनच आहेत.”

Story img Loader