Kiran Samant on Rajan Salvi : “मला खासदारकी (लोकसभेची निवडणूक) लढवायची होती”, असं वक्तव्य राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केलं आहे. किरण सामंत म्हणाले, “मला राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन देखील मिळालं होतं. मात्र मी लोकसभेवर ठाम होतो”. राजापूरातील एका कार्यक्रमात किरण सामंत बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले, “रत्नागिरीमधील भविष्यातील निवडणुका या राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली लढवायच्या आहेत”. माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेला (ठाकरे) जय महाराष्ट्र करत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला आहे. पक्षांतरानंतर ते पहिल्यांदाच राजापूरमधील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी येथील विद्यमान आमदार किरण सामंत देखील मंचावर उपस्थित होते. सामंत यांनी साळवी यांचं पक्षात स्वागत केलं. तसेच ते म्हणाले, “मी खासदार, उदय सामंत रत्नागिरीचे आमदार आणि तुम्ही (राजन साळवी) राजापूरचे आमदार ठरलं होतं. मात्र साळवी यांनी त्यावेळी निर्णय घेतला नाही. हरकत नाही, आता एकत्र मिळून मतदारसंघाचा विकास करू”.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा