ईडीने मिया हसन मुश्रीफ यांच्या अनेक कंपन्या आणि कार्यालयावर धाडी टाकल्या आहेत. रजत कंजुमर आणि माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या खात्यावरून ४९ कोटी ८५ लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यावर आले. त्यावर हसन मुश्रीफ काय बोलत नाहीत, असा हल्लाबोल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हेही वाचा : ईडीची छापेमारी मोठे षडयंत्र; ‘त्या’ चित्रफितीसह हसन मुश्रीफ यांचा सोमय्या यांच्यावर निशाणा

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”

कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर किरीट सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले, “आपल्या जावयासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर जिझिया कर लावण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीने ५० हजार रुपये जावयाच्या कंपनीला देण्याचा आदेश मुश्रीफांनी काढला. त्यामुळे दरवर्षी १५० कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसणार होता. आम्ही हा घोटाळा समोर आल्यावर कंत्राट रद्द करण्यात आलं. पण, याची संपूर्ण चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलं आहे. हुंडा म्हणून हसन मुश्रीफांनी जावयाला प्रत्येक वर्षी १५० कोटी रुपये दिलं,” असा आरोप सोमय्यांनी लगावला.

हेही वाचा : पंकजा मुंडे भाजपातून बाहेर पडणार? ठाकरे गटाकडून खुली ऑफर

“मुंबई महापालिकेत कोविड घोटाळा झाला. तत्कालीन सत्ताधारी नेत्यांसाठी कोविड हे कमाईचं साधन होतं. संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांनी लाईफलाईन रुग्णालय सर्व्हिसेसला १०० कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं. ही कंपनी कधीच अस्तित्वात नव्हती. तसेच, त्यांना रुग्णालयाच चालवण्याचा कोणाताच अनुभव नाही. मग, या कंपनीला १०० कोटी रुपयांचं कंत्राट कसं दिलं. या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनेक करोना रुग्णांचा मृत्यू झाला,” असेही किरीट सोमय्यांनी सांगितलं.

Story img Loader