राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातही गेल्या दोन दिवसांत तापमानात लक्षणीय घट झाली असून जोरदार बोचरे वारे वाहू लागले आहेत. यंदा नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी कोकणात म्हणावी तशी थंडी नव्हती. रत्नागिरी शहरात सरासरी १८ ते २० अंश तापमान होते. पण कालपासून त्यामध्ये अचानक घट होऊन किमान तापमान १६.८ अंश नोंदले गेले. सरासरीच्या मानाने ही सुमारे ४ ते ५ अंशाची घट आहे. त्याचप्रमाणे सकाळपासून जोरदार वारे वाहत आहेत. उत्तर भारतातील कोरडय़ा व थंड वाऱ्यांमुळे हवामानात हा बदल झाला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. आंबा पिकाच्या दृष्टीने मात्र हा बदल स्वागतार्ह असल्याचे मानले जाते. अशाच प्रकारे पुढील महिन्यापर्यंत थंडीचे वातावरण कायम राहिल्यास वेळापत्रकानुसार झाडांवर मोहोर धरू लागेल आणि चांगले पीक येण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2012 रोजी प्रकाशित
कोकणातही बोचरे वारे आणि तापमानात घट
राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातही गेल्या दोन दिवसांत तापमानात लक्षणीय घट झाली असून जोरदार बोचरे वारे वाहू लागले आहेत. यंदा नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी कोकणात म्हणावी तशी थंडी नव्हती. रत्नागिरी शहरात सरासरी १८ ते २० अंश तापमान होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-11-2012 at 06:18 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan also child