अलिबाग : तस्करीमुळे कोकणातील खवले मांजर अती दुर्मिळ वन्यजीवाचे अत्सित्व धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षात कोकणात खवले मांजर तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने या प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा अतिशय दुर्मिळ समजली जाणारी ही वन्यप्रजाती नामशेष होण्याची भिती वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षात खवले मांजर तस्करीची अनेक प्रकरणे जिल्ह्यात समोर आली आहे. मात्र कारवाई नंतरही या प्राण्याची तस्करी थांबलेली नाही. ट्रेड रेकॉर्डस ॲनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फाउना इन कॉमर्स आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ – इंडिया यांनी खवले मांजर यांची होणाऱ्या शिकारी बद्दलची माहिती प्रकाशित केली आहे. देशात महाराष्ट्राचा खवले मांजरांच्या जप्तीवरील कारवाई करण्यात दुसरा क्रमांक लागतो. तर देशात अवैध वन्यजीव व्यापारासाठी वर्षभरात १ हजार २०३ खवले मांजरांची शिकार आणि तस्करी झाल्याचे नोंद आहे. या तस्करीमुळे खवले मांजरांचे अस्तित्व मात्र धोक्यात येत चालले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा