Maharashtra Political News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तर बारसू या ठिकाणी जो रिफायनरी प्रकल्प आणला जातो आहे त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राज्यात झडत आहेत. या प्रकल्पाला उद्धव ठाकरे गटाकडून विरोध होतो आहे. तर कुणाची सुपारी घेऊन हा विरोध करत आहात? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. दुसरीकडे बारसू प्रकल्पाविषयी राज ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे. तसंच महाराष्ट्रात काय काय घडतं आहे? त्यावरही आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष ठेवून असणार आहोत.