लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : लावणी ही लोककला लोकसाहित्याबरोबर लोककलेत अधिक लोकप्रिय झाली असल्याचे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि दिल्ली येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी सांगली येथे केले.

Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Marijuana worth six lakh rupees seized in Parbhani
परभणीत सहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
BJP celebrates in Sangli after victory in Delhi
दिल्लीतील विजयानंतर सांगलीत भाजपचा जल्लोष
Bhagwant Mann VS Arvind Kejriwal
AAP Politics : केजरीवालांना मोठा धक्का बसणार? ‘भगवंत मान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात’, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने ‘आप’मध्ये खळबळ
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही”, दिल्लीच्या निकालावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे यांच्या ‘लावणी : रूप आणि आविष्कार’ या संदर्भग्रंथाचे प्रकाशन श्रीमती डॉ. भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. साहित्यिक महेश कराडकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. शिंदे यांनी स्वागत केले. या वेळी मोहन खोत, प्रा. डॉ. विष्णू वासमकर, चित्रकार राहुल टिंगरे आदी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. भवाळकर पुढे म्हणाल्या, ‘सांगली जिल्ह्यातील शाहिरांनी लावणीरचना अतिशय उत्कृष्ट व सुंदर लिहिल्याने लावणी अधिक समृद्ध झाली. यामुळे तिला लोकप्रियता मिळाली.’ डॉ. शिंदे म्हणाले, ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडात तमाशाबरोबर मराठी चित्रपटामुळे लावणी अधिक लोकप्रिय व लोकाभिमुख झाली असून, सांगली जिल्ह्यातील शाहिराचे लावणीरचनेत मोठे योगदान आहे.’

कराडकर म्हणाले, ‘जिल्ह्यातील शाहिरांनी आपल्या दमदार शाहिरी सादरीकरणाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.’

Story img Loader