विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पोलखोल महा पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. वरळी डोम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात काय काय झालं? त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाविरोधात कसा निकाल घेतला? याबद्दल विस्तृतपुणे कायदेशीर विवेचन केले. हे करत असताना त्यांनी राज्याच्या माजी राज्यपालांचा सर्वात फालतू माणूस असा उल्लेख केला.

वकील असीम सरोदे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड करणं आवश्यक आहे. लोकशाही कशी मारली जाते, हे यातून दिसणार आहे. लोक माझ्यासारख्या वकिलांना म्हणतात की, तुम्ही वकील आहात, राजकारणावर बोलू नका. भारतीय संविधान एक राजकीय दस्ताऐवज आहे. राज्यव्यवस्था म्हणून भारत कसा चालेल, याविषयीचं ते राजकीय दस्ताऐवज आहे. अगदी नागरिक असणंही राजकीय संकल्पना आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने राजकारणावर बोललं पाहिजे.

High Court asked the state if there's evidence against Saurabh Tripathi and Ashutosh Mishra
अंगाडिया खंडणी प्रकरण : IPS अधिकरी सौरभ त्रिपाठींविरोधात पुरावे आहेत का? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Interrogation of Siddaramaiah by Lokayukta Police Decision of the Special Court
सिद्धरामय्यांची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी; विशेष न्यायालयाचा निर्णय, गुन्हा दाखल होणार
Due to Union Home Minister Amit Shahs visit administration denied protest permission at golf club
नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांची निदर्शने
sanjay gandhi national park contribution to mumbai is more than the bmc budget
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे योगदान हे महापालिकेच्या अर्थसंकल्पापेक्षा भरीव; उच्च न्यायालयाची टिप्पणी
ram jhula hit and run case
“तांत्रिक कारणांमुळे न्याय पराभूत होता कामा नये”, रितू मालू प्रकरणी सत्र न्यायालय म्हणाले…
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?
supreme court on cbi in arvind kejriwal bail case
“CBI ची तुलना पिंजऱ्यातल्या पोपटाशी…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पुन्हा केली ‘त्या’ उक्तीची आठवण; नेमकं काय घडलं होतं तेव्हा?

हे वाचा >> राहुल नार्वेकरांच्या निकालावर असीम सरोदेंचं मुद्देसूद उत्तर; व्हीपपासून विधिमंडळ पक्षापर्यंत सर्व मुद्द्यांचा केला समावेश!

मी ठाकरेंची बाजू मांडत नाही..

उबाठा गटाने आयोजित केलेल्या खुल्या पत्रकार परिषदेते बोलत आहे, म्हणून मी ठाकरेंची बाजू मांडतोय, असे अजिबात समजू नका, असेही सरोदे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे संविधानाच्या बाजूने आहेत, म्हणून मी त्यांच्या बाजूने आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षांतर बंदी कायद्याच्या उद्देशाला हरताळ

शिवसेना फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख झाला. हा कायदा पक्षांतर करण्यासाठी नसून पक्षांतर रोखण्यासाठी आहे, असे सांगून सरोदे म्हणाले की, या कायद्याच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या पद्धतीने या कायद्याचा अर्थ लावून आपले अन्यायकारक कृत्य झाकले, अशी टीका त्यांनी केली.

पक्षांतर बंदी कायद्यातील कलम १ ब चे उदाहरण देताना सरोदे यांनी विधीमंडळ पक्ष आणि कलम १ क नुसार राजकीय पक्षाच्या व्याख्या काय आहेत? याची माहिती दिली. “विधिमंडळ पक्षाचं आयुष्य ५ वर्षांचं असतं. त्यामुळे ती अस्थायी स्वरुपाची व्यवस्था आहे. त्यामुळे कायद्यात विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही. मूळ राजकीय पक्षाला महत्त्व आहे. इथे मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे”, असे सरोदे म्हणाले.

Maharashtra Breaking News Live: “राहुल नार्वेकरांनी तेव्हा राजीनामा दिलाच नाही”, असीम सरोदेंनी ठेवलं ‘या’ मुद्द्यावर बोट!

राज्यपाल फालतू माणूस…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत बोलत असताना सरोदे यांनी न्यायाधीशांनी राज्यपालांबाबत केलेल्या एका टिप्पणीची आठवण करून दिली. “राज्यपालांनी या राज्यातील सरकार उलथवून लावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली”, अशा शब्दात घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीवर सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. याबद्दल असीम सरोदे यांनी माजी राज्यपालांना फालतू माणूस म्हटले. त्यावेळी महाराष्ट्रात भगत सिंह कोश्यारी राज्यपाल पदावर होते.