जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर आता विविध चर्चांना उधाणं आलं आहे. दरम्यान, यासंदर्भात आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – ‘शिक्षकांना शेअर बाजाराप्रमाने भाव लावला’, पैसे वाटल्याचा आरोप करत संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

CM Eknath Shinde, Eknath Shinde visit Buldhana,
“आई भवानी आमच्या सावत्र भावांना सुबुद्धी….”, दर्शनाला गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना डिवचले
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Mahayuti Social Outreach through various programs in Nashik print politics news
नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण
narhari zirwal on son gokul zirwal
“सरकार आमचं ऐकत नाही, हे म्हणण्याची वेळ आली आहे”, नरहरी झिरवाळांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर!
Sharad Pawar criticism of the rulers over the economic power in the state print politics news
सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात अर्थसत्तेची मस्ती – पवार
laxman hake criticized sharad pawar
Laxman Hake : “शरद पवार हे महाजातीयवादी नेते”, आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांची टीका; म्हणाले, “पवार कुटुंबातील व्यक्ती…”
Tribal Reservation Rights Action Committee warns the state government
धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

“हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेला आहे. पण मुस्लीम समाजाकडे धर्म म्हणून बघितलं जातं. त्यांच्यात जाती नसल्याने त्यांच्यातील कारू आणि नारू, असे दोन गट पडतात, यापैकी कारू हा व्यवसाय करणारा घटक आहे. त्यामुळे त्यांना संविधानानुसार स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र दिलं जातं”, असं लक्ष्मण हाके म्हणाले. “ओबीसींच्या हक्कासाठी शब्बीर अन्सारी यांचं मोठं काम आहे. त्यांनी मुस्लिमांच्या अधिकारासाठी जवळपास १०० अध्यादेश सराकरकडून काढून घेतलं आहेत. यासंदर्भात शब्बीर अन्सारी सफाईदारपणे उत्तर देऊ शकतात”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली होती. “सरकारी नोंदी या मारवाडी, ब्राह्मण, लिंगायत आणि मुस्लिमांच्या सुद्धा निघाल्या आहेत. जर त्यांच्या नोदी शेतकरी कुणबी म्हणून निघाल्या असतील, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये”, असं ते म्हणाले होते.

हेही वाचा – NEET पेपरफुटीचे लागेबांधे महाराष्ट्रापर्यंत; लातूरमधून दोन शिक्षकांना ताब्यात घेतले, चौकशीनंतर सुटका

“आता सरकारने कायद्याने बोलावं, पाशा पटेल यांची सुद्धा कुणबी नोंद निघाली आहे. जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, आणि सरकार आरक्षण कसं देत नाही, तेच मी बघतो”, असा इशाराही त्यांनी दिला होता.