सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेल्या मुद्दा म्हणजे मशिदींवरील भोंगे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये या मुद्द्याला हात घातल्यानंतर १२ एप्रिलच्या सभेमध्ये पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन मेचं अल्टीमेटम दिलं आहे. असं न झाल्यास आपण मशिदींसमोर भोंग्यांवरुन हनुमान चालीसा वाजवू असं राज यांनी म्हटलंय. मात्र यामुळे राज्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज ठाकरेंवर टीका करतानाच थेट त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच राज यांना आवर घालण्याची विनंती केलीय.
नक्की वाचा >> “येईल, भाषण देईल आणि…”, औरंगाबादेत NCP कार्यकर्त्यांसमोर सुप्रिया सुळेंनी उडवली राज यांची खिल्ली; सभागृहात पिकला हशा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा