रत्नागिरी : भास्कर जाधव या सापाला मी दूध पाजले आहे. पण आता याचा फणा ठेचल्याशिवाय राहणार नाही. याला पुढील विधानसभा बघू देणार नाही, असा निर्धार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शनिवारी रात्री गुहागर तालुक्यातील श्रृंगार तळी येथे मेळावा आयोजित करण्यात आला या वेळी आमदार जाधव आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका करताना कदम म्हणाले की, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माझा बळीचा बकरा करण्यासाठी पाठवले होते. मी मातोश्रीह्णला सांगून आलो होतो की, मी मराठा आहे. त्यामुळे लढून पडणार आहे. या वेळी माझ्याशी गद्दारी झाली. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून अनंत गीतेंनी माझ्या विरोधात प्रचार केला. माझ्याशी दगाबाजी करण्यात आली. या वेळी भाजपाचे डॉ. विनय नातू यांना बाळासाहेब ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यपद देतो, असे सांगूनही त्यांनी माघार घेतली नाही. पण निवडणुकीत पडल्यानंतर या मतदारसंघात आलो नाही, ही माझी चूक झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा