अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं? यावरून नवीन पेच निर्माण झाला आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगासमोर गेलं आहे. ६ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गटाने बहुसंख्य आमदार आमच्याच बाजुला आहेत, असा दावा केला. तसेच शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला, तोच निकाल आम्हाला द्या, अशी मागणीही अजित गटाने केली.

या मागणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला, तोच निकाल आमच्या बाबतीत द्या, अशी मागणी करणं, हे अज्ञानाचं लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया बापट यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Girish Mahajan On Nashik and Raigad Guardian Minister
Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटेल? गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा प्रश्न…”
Santosh Deshmukh family expresses expectations from Ajit Pawar for justice
“अजितदादांनी प्रथम न्याय देण्याचे कार्य करावे,” संतोष देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा

हेही वाचा- “…मग शरद पवार मेणाचा पुतळा आहेत का?” संजय राऊतांचा सवाल, नेमकं काय म्हणाले?

संघटनात्मक बहुमत आणि लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला. तोच निकाल आम्हाला द्या, या अजित पवार गटाच्या मागणीबाबत विचारलं असता उल्हास बापट म्हणाले, “हे तर माझ्या मते, अज्ञानाचं लक्षण आहे. शिवसेनेबाबत निवडणूक आयोगानं जो निकाल दिला होता, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून निवडणूक आयोगाला योग्य तो अर्थ लावावा लागेल. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला, तोच निकाल आमच्या बाजुने द्या म्हणणं, हे कायद्याचं अज्ञान आहे.”

हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीत होणाऱ्या विलंबावर भाष्य करताना उल्हास बापट पुढे म्हणाले, “माझ्यामते शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दोन ते तीन महिन्यात लागणं आवश्यक होतं. पण दुर्दैवाने आताच याला चार महिने झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची तर आताच सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या निवडणुका होईपर्यंत हे लांबत राहील. उशिरा मिळालेला न्याय हा एकप्रकारे अन्याय असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांकडून जो विलंब लागतो, तो अक्षम्य आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे.”

Story img Loader