Maharashtra Breaking News : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिवेशनात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, मराठा आरक्षण, ओबीसींच्या मागण्या, कापूस, सोयाबीनचे दर, दूधाच्या दरासह आदी महत्वाच्या प्रश्नांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. याचबरोबर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवरील फेरविचार करण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण अंबादास दानवे यांनी या संदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शिविली होती. त्यामुळे दानवे यांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.