Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. याच अधिवेशनात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार असल्यामुळे विधानसभेत मतांची जुळवाजुळव करण्याची लगबग सुरू आहे. शिवसेना उबाटा गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या रुपाने बारावा उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. तसेच अजित पवार गटाने अधिवेशनाबाबत घेतलेल्या बैठकीत आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यामुळे महायुतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. विधानसभेच्या एका मतासाठी आता नवाब मलिक यांचा पाठिंबा घेणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.