Maharashtra News Updates Today : राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील अनेक आमदार त्यांना मंत्रीपद मिळणार असा दावा करत आहे. दुसरीकडे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन करणार असल्याच्या मुद्द्यावरही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. १९ विरोधी पक्षांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स…
Mumbai News Updates Today : राजकारणासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीच्या अपडेट्स एका क्लिकवर…
पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी व नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्यावी.
– नाना पटोले (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)
पप्पू फिर फेल हो गया !
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 25, 2023
पता नहीं क्यों राहुल गांधी खुद को बार-बार पप्पू साबित करने का मन करते है। वास्तव में वो जब भी मुँह खोलते हैं तो उनकी अज्ञानता सामने आती है अगर राहुल गांधी जी को अपने पिताजी, माताजी, दादी जी ने क्या किया है ये पता होता तो आज पप्पू फेल ना होता ।
राहुल जी ने…
चित्रा वाघ म्हणाल्या, “'पप्पू फिर फेल हो गया'. राहुल गांधी पप्पू आहेत हे जगजाहीर आहे. तरी पण वारंवार पप्पू असल्याचं सिद्ध करण्याची हुक्की त्यांना का येते हे कळत नाही. खरंच त्यांचा अभ्यास कच्चा आहे.”
“राहुल गांधींनी नवीन संसद भवन उद्घाटनावर बहिष्कार टाकून अपशकुन आणण्याचा प्रयत्न केला, पण असे कितीही मांजर-बोके आडवे गेले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास रथ रोखता येणार नाही,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
“संसदेसारख्या पवित्र मंदिरावर बहिष्कार टाकणाऱ्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहावा. विरोध करणाऱ्यांचा बुरखा टराटरा फाटलाय,” असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला.
यावेळी चित्रा वाघ यांनी विधान सभा भवन आणि संसदेच्या इमारतींचे उद्घाटन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादीच वाचून दाखवली. ती यादी खालीलप्रमाणे…
इंदिरा गांधी – संसदेच्या अॅनेक्स इमारतीचे उद्घाटन केले.
इंदिरा गांधी – महाराष्ट्राच्या विधान भवनाचे उद्घाटन इंदिरा गांधींच्या हस्ते झाले.
राजीव गांधी – संसदेच्या लायब्ररी इमारतीचे उद्घाटन केले.
मनमोहन सिंग – सोनिया गांधींनी मणिपूरच्या इंफाळ येथे विधान भवनाचे उद्घाटन केले.
नितीश कुमार – नितीश कुमारांच्या हस्ते बिहार विधान भवनाच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन झाले.
तामिळनाडू विधानसभेच्या उद्घाटनाला सोनिया गांधी हजर होत्या. राज्यपालांना बोलावलं नाही.
तरुण गोगोई – आसाम विधानसभेचे उद्घाटन काँग्रेसचे नेते तरुण गोगोई यांच्या हस्ते झाले.
आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी २०१८ मध्ये विधानभवनाचे उद्घाटन केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री मा. श्री. अरविंद केजरीवाल यांनी आज मा. खा. शरदचंद्र पवार साहेब यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पंजाबचे मुखमंत्री श्री. भगवंत मान, आम आदमी पक्षाचे इतर नेते सुद्धा उपस्थित होते.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 25, 2023
राजधानी दिल्लीचे प्रशासकीय अधिकार… pic.twitter.com/7f7itkbPWo
जयंत पाटील म्हणाले, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पंजाबचे मुखमंत्री भगवंत मान, आम आदमी पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते.”
“राजधानी दिल्लीचे प्रशासकीय अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या हातात दिले होते. केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला फाटा फोडला आहे. एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. केंद्र सरकारच्या या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत एकत्र येण्याच्या दृष्टीने आज चर्चा झाली,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
कोल्हापूर: ऐतिहासिक पन्हाळा गडावरील तानपीर बाबांचा दर्गा मजारीची मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून नासधूस केली होती. या घटनेनंतर तणावाचे वातावरण बनले. प्रशासनाच्या सहकार्याने स्थानिक हिंदू-मुस्लिमांनी एकजूट दाखवत मजारीची पूर्ववत उभारणी केली.
नाशिक: मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागातील २६ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक बिकट होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मालेगाव येथील जुन्या बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई: मुंबई विद्यापीठ प्रशासनाने आगामी अधिसभा निवडणुकीसाठी नुकतीच प्राचार्य, संलग्न महाविद्यालयातील शिक्षक, विद्यापीठातील शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी, विभागप्रमुख या मतदारसंघासाठीची अंतिम मतदारयादी जाहीर केली.
राज्यात ऐन उन्हाळ्यात शेतीला पाण्याची गरज असताना वीज पुरवठा खंडीत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पाण्याविना पीकं जळल्याने अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याबाबत मोठी घोषणा केली. तसेच आता शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडीत वीज देऊ, असं जाहीर केलं. ते गुरुवारी (२५ मे) सोलापूरमध्ये भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनात बोलत होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आपच्या नेत्यांनी गुरुवारी (२५ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यानंतर शरद पवारांनी या भेटीवर बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी भेटीचं कारण सांगतानाच दिल्ली सरकारच्या अधिकारांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा केजरीवाल सरकारला पाठिंबा जाहीर केला. तसेच इतर राज्यातून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही नमूद केलं.
मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सशुल्क घरासाठी झोपडीवासीयांना अडीच लाख रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय अखेर शिंदे-फडणवीस सरकारने जारी केला आहे.
हे कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही. यांनी २०१९ मध्येही हे करून पाहिलं. वेगवेगळ्या राज्यांमध्येही हे करून पाहिलं. मात्र, जनता मोदींच्या पाठिशी, भाजपाच्या पाठिशी आहे. त्यामुळे लोकसभा असो की विधानसभा असो भाजपालाच पाठिंबा मिळेल.
– देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण मोडीत काढण्याचं काम केलं. सामाजिक-आर्थिक परिवर्तनाची लढाई देशाचा पंतप्रधान म्हणून लढली जाऊ शकते आणि सर्वसामान्यांच्या जीवनात परिणामकारक बदल घडवला जाऊ शकतो हे गेल्या ९ वर्षात मोदींनी दाखवून दिलं. त्यामुळे ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते एकत्र येत आहेत आणि मोदींवर टीका करत आहेत.
– देवेंद्र फडणवीस
यातील दुसरं क्रांतीकारी पाऊल म्हणजे सोलर फीडर तयार करण्यासाठी सरकारी जमीन नसेल, तर आम्ही शेतकऱ्यांची खासगी पडीक जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊ.
– देवेंद्र फडणवीस
नाशिक: शहरात त्र्यंबक रस्त्यावरील धामणकर चौकात दुचाकी दुभाजकावर धडकल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
आता मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी ही क्रांतीकारी योजना आणली आहे. त्यात आपण कृषीवाहिन्या सोलरवर कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास वीज देणार आहोत.
– देवेंद्र फडणवीस
मुंबई: मुंबईतील नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून नाल्यांमधून १०० टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. नाल्यांमधून ३१ मेपर्यंत गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.
डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील एका बेकायदा इमारतीच्या मजल्यांवर सिमेंट, विटा, सिमेंट गिलावा वाहून नेण्यासाठी एक उद्वाहन रस्त्याच्या बाजुला आणि इमारती लगत उभी करण्यात आले आहे. अतिशय धोकादायक स्थितीत हे उद्वाहन उभे असल्याने वादळी वारा आला तर कोसळण्याची भीती पादचारी, वाहन चालक, परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नागपूर: नागपूर विभागाने यंदा परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ केली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गतही भरारी पथके नेमण्यात आली होती.
बुलढाणा: आज जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्याने बाजी मारली असून अमरावती विभागात बुलढाणा द्वितीय ठरला आहे. नेहमीच्या अलिखित नियमाप्रमाणे निकालात मुलींचा डंका वाजला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३३ हजार ५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. सविस्तर वाचा…
नागपूर : महा मेट्रो नागपूर अंतर्गत नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या सर्वत्र मेट्रो सेवा सुरु असून मोठ्या प्रमाणात नागरिक या सेवेचा उपयोग करीत आहे. यामध्ये आणखी भर घालत नागपूर मेट्रो स्टेशनच्या छतावर उपलब्ध जागेवर ओपन एअर रेस्टॉरंट, सुरू करण्याचा प्रस्ताव आहे यासाठी निविदा काढण्यात आल्या आहे. सविस्तर वाचा…
व्हॉट्सॲप, फेसबुकसह विविध समाज माध्यमांवर मंदिर, मशीद, चर्चबाबत प्रतियुनिट विविध वीज दराचा दावा करत मंदिरसाठी सर्वाधिक दर असल्याचे संदेश फिरत आहे. हा संदेश नागरिकांची दिशाभूल करण्यासोबत सामाजिक सलोख्याचे वातावरण दुषित करण्याचा प्रकार असल्याचा महावितरणचा दावा आहे. सविस्तर वाचा…
रखरखत्या उन्हामुळे टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा जीवही कासावीस झाला आहे. तहान भागविण्यासाठी वाघ पाणवठ्यावर येत असल्यामुळे पर्यटकांचीही या ठिकाणी गर्दी वाढली आहे. दरम्यान, पाणवठ्यावर आलेली एक वाघीण जखमी असल्याचे पर्यटकांनी टिपलेल्या छायाचित्रात दिसून आले. सविस्तर वाचा…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल गुरूवारी आभासी प्रणालीन्वये जाहीर झाला. नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २.६९ टक्क्यांनी घट झाली आहे. सविस्तर वाचा…
मुंबईः चढ्या भावाने हिऱ्यांची आयात करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला नुकतीच सीमाशुल्क विभागाने अटक केली. आरोपी संचालकाला यापूर्वी गुजरातमधील महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अटक केली होती.
पनवेल : नवीन पनवेलकडून पनवेल शहराकडे जाणा-या रेल्वे रुळाजवळील नाल्यामध्ये ४५ ते ५० वयोगटातील पुरुषाचा बेवारस नग्नावस्थेतील मृतदेह पोलीसांना सापडला आहे. तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीसांनी मृतदेहाजवळ सापडलेले छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. रेल्वे रुळालगतच्या नाल्यात हा मृतदेह कसा आला या शोधात पोलीस आहेत. या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरांच्या मार्फत पोलीस शोध घेत आहेत. संबंधित मृतदेहाच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील यांनी दिली. तसेच मृतदेहाजवळ सापडलेले छायाचित्र आणि मृतदेहातील व्यक्ती यामध्ये साम्य असून या छायाचित्रास ओळखणा-यांनी खांदेश्वर पोलीसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Hon'ble CM of Delhi Shri @ArvindKejriwal and Punjab CM @BhagwantMann Addressing an Important Press Conference | LIVE https://t.co/LTNY3FQqFs
— AAP (@AamAadmiParty) May 25, 2023
आजची पत्रकार परिषद महत्त्वाची आहे. देशासमोर एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न केवळ दिल्लीचा नाही, तर संसदीय लोकशाहीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकनियुक्त सरकारकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा आहे.
– शरद पवार
नाशिक: सिन्नर ते शिर्डी महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बस चालकाने बसमध्येच आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
जळगाव – जिल्ह्यातील चोपडा येथे बनावट कापूस बियाणे, तर धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ बनावट खतांचा साठा मिळून आला. चोपड्यात स्वदेशी-५ या बनावट कापूस बियाणांच्या विक्री प्रकरणी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षालाच अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली: येथील पूर्व भागातील चार रस्त्यावरील रघुवीरनगर मधील श्रमसंपदा निधी गुंतवणूक कंपनीने ४७ ग्राहकांची गेल्या वर्षभराच्या कालावधीत १७ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल पाहण्यास अडचणी आल्यास मदतीसाठी राज्य मंडळाने सहा फोन नंबर जाहीर केले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
महाराष्ट् न्यूज लाइव्ह