Maharashtra Crisis Updates in Marathi : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीसह इतर विषयांबाबत चर्चा केली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केला.
दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तर ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना पूर्वी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Latest News Updates, 14 September 2022: अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करतांना प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी कॅशलेस व्यवहारासाठी फोन-पे, क्युआर कोड स्कॅनिंग तसेच एन.एम.एम.टी.बस ट्रॅकर ॲपद्वारे तिकीट बुकींग व ऑनलाईन बसपास यांच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे.
रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी. मेट्रो, बीआरटीप्रमाणे रिक्षा, टॅक्सीलाही सार्वजनिक सेवेचा दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे ठराव दिल्लीत येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत मंजूर करण्यात आले.
प्रवासी म्हणून बसून निर्जन ठिकाणी गाडी थांबवुन चाकूचा धाक दाखवून वाहन चालकास लुटणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केले आहे. आरोपीच्या अटकेने अशाच प्रकारच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली असून त्याच्या नावावर यापूर्वी चार गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे.
महाराष्ट्र सोडून इतर राज्यात प्रकल्प जाणे खुप दुर्दैवीची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणाच्या नोकऱ्या जाणार आहेत. हा विषय राजकीय न करण्याची राज्य सरकारला विनंती आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फिडरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. जवळपास बारा तास वीजपुरवठा खंडित होता. मात्र विद्यापीठातील परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्यासह पाहुण्यांना वीजपुरवठा खंडित झाल्याचा त्रास सहन करावा लागला.
सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने मुंढव्यातील एका हॅाटेलमध्ये पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.
बेरोजगारी व तुटपुंज्या कमाईला कंटाळून झटपट श्रीमंत होण्याच्या नाद बुलढाण्याच्या युवकांना चांगलाच भोवला. उद्योगपतीचे अपहरण करायला ते दिल्लीत गेले नि अडकले. ‘ त्या’ तिघांना दिल्लीत पोलिसांनी पकडले. ते मूळचे बुलढाण्याचे निघाल्याने त्यांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
येथील सुभाषवाडी परिसरात राहणाऱ्या एका ७४ वर्षीय वयोवृद्ध महिलेचे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून तिचे दागिने लुटल्याच्या प्रकार समोर आला आहे. यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या हाताला देखील दुखापत झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात गांजा, मोबाईल, बॅटरी आणि सीमकार्ड सापडत असल्यामुळे कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे. त्यात विदर्भातीस सर्वात मोठा ड्रग्स तस्कर आबू खानला एका कुख्यात कैद्याने मारहाण केल्यामुळे पुन्हा नागपूर कारागृह चर्चेत आले आहे.
राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. ‘फाॅक्सकाॅन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती.
गेल्या काही दिवसांपासून राज्यसह नवी मुंबई शहरात पावसाची उघडझाप सुरू आहे. पावसाच्या संततधारेने भाज्यांच्या दर्जावर परिणाम होत असून पाण्याने भिजलेल्या भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा भाज्या कमी दराने विकण्याची नामुष्की व्यापाऱ्यांवर ओढावली आहे.
मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे. पावसामुळे वर्गखोल्यांना गळती लागली आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून येथे शिक्षण घ्यावे लागत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी पाल्यांसह चक्क मालेगाव पंचायत समितीच्या सभागृहातच शाळा भरविली.
पुणे : लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजेतील आकाशनगर परिसरात झालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा वारजे पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी गौरी सुनील डांगे (वय.२४) हिला ताब्यात घेतले आहे. बातमी वाचा सविस्तर...
उरण : सिडकोच्या बोकडविरा ते शिर्के वसाहत मार्गावरील पथदिवे भर दिवसा सुरू असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकदा याच मार्गावरील उड्डाणपूलावरील दिवे बंद असल्याने प्रवासी व नागरिकांना अंधारातून धोकादायक प्रवास करावा लागत असतांना दिवसाढवळ्या पथदिवे सुरू ठेवून विजेचा अपव्यय केला जात आहे. बातमी वाचा सविस्तर...
भिवंडीतील पूर्णा भागात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास खाद्य तेल आणि औषधांचा साठा असलेल्या तीन ते चार गाळ्यांना अचानक आग लागली होती. या आगीत गाळ्यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
खोपटे ते चिरनेर मार्गावरील मोठीजुई कळंबुसरे – चिरनेर बाह्यवळण रस्त्यावर संपूर्ण वाहन अडकून पडेल इतके मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी मनसे ने सार्वजनिक बांधकाम विभागा कडे केली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फेरबदल्यांमुळे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर टीका झाल्यानंतर आता प्रशासनाने मौन सोडले आहे. प्रशासनातील वरिष्ठ पातळीवर होत असलेले फेरबदल हे पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाचे आहेत.
प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात रस्ते सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली. याच कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकावू परवाना दिला जाणार असून, असा कक्ष सुरू झालेले फर्ग्युसन हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे.
कोंबड्यांची शिकार करायला गेलेला बिबट खुराड्यात अडकल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भद्रावती शहरातील खापरी वॉर्ड येथील साई नगरात उघडकीस आली.येथील निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरातील पाळीव कोंबड्यांच्या खुराड्यात अडीच वर्षीय बिबट्याने प्रवेश केला.
म्हाडातील रिक्त ५६५ पदांच्या भरतीसाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला. म्हाडाने ५६५ पैकी ५३३ पदांचा निकाल जाहीर केला.
डोंबिवली जवळील संदप गावातील एका ४५ वर्षाच्या केबल व्यावसायिकाने गावातील केबल व्यावसायिक १५ स्पर्धकांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी दातिवली-निळजे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अज्ञात एक्सप्रेस समोर आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी केबल व्यावसायिकाने मोबाईलव्दारे दृश्यध्वनी चित्रफित तयार करून ती आपल्या बंधूला पाठविली होती.
गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे. प्रकृती खालावूनही पुरामुळे उपचारासाठी बाहेर पडू न शकणाऱ्या ९० वर्षीय वृद्धेसह आठ रुग्णांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले.
शहरातील , खारफुटी, कांदळवन , मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'डेब्रिज ऑन कॉल' तसेच 'भरारी पथक कारवाईच्या माध्यमातून तुर्भे येथे राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा येत्या दीड वर्षात अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पॉर्पोईज या प्रजातींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सहयाद्री अतिथीगृहात कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बातमी वाचा सविस्तर...
देशात स्वच्छ शहराच्या यादीत मागील अनेक वर्ष वरचे स्थान प्राप्त करण्याचा नावलौकीक मिळवलेल्या नवी मुंबई शहरात होऊ घातलेल विमानतळ , शिवडी नाव्हाशेवा सागरी मार्ग,तसेच वाढती जलवाहतूक , विस्तारत असलेली रेल्वेसेवा यामुळे झपाट्याने विकसित झालेल्या व तसेच आगामी काळात मोठी मागणी असलेल्या महामुंबई परिसरात जागांचे दर कोट्यावधींची उड्डाणे घेत आहे.
मुंबई : पर्यटकांसाठी कायमच आकर्षण ठरलेल्या आणि स्थानिकांसाठी दळणवळणाचे साधन असलेल्या माथेरान मिनी ट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली असून मध्य रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. बातमी वाचा सविस्तर...
घोडबंदर येथील खेवरा सर्कल भागात असलेल्या विद्युत मनोऱ्यावर मंगळवारी रात्री झालेल्या दुर्घटनेनंतर येथील रहिवासी महावितरण कंपनी विरोधात आक्रमक झाले आहेत. बुधवारी सकाळी येथील रहिवाशांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे हा मनोरा हटविण्याची मागणी केली आहे.
कल्याण शिळफाटा रस्त्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालाच पाहिजे. या मागणीसाठी भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्ते बांधित शेतकरी संघटनेतर्फे येत्या मंगळवार पासून (ता.२०) काटई जकात नाका (आंगण ढाबा) येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे, अशी माहिती या संघटनेचे गजानन पाटील यांनी दिली.
उल्हासनगर : बारमध्ये बाहेरील दारू आणल्याने एका २५ वर्षीय तरुणाला बार व्यवस्थापकाने लोखंडी सळीने जबर मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी बार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. बातमी वाचा सविस्तर...
महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसून आली आहे. पशुसंवर्धन विभागाने पाच किलोमीटर परिसरातील पशुपालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बातमी वाचा सविस्तर...
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारमुळे वाढणार आहेत. सोमवारी रात्री झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे सरकारने केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेला म्हणजेच सीबीआयला देशमुखांविरोधात खटला चालवण्यास हिरवा कंदील दिला आहे.