Maharashtra Breaking News : राज्यात दिवाळीनंतर निवडणुका घेतल्या जातील असे संकेत निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिले असले तरीही प्रत्यक्षात डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये या सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबल्या असल्याचंही बोललं जातंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा एकाच वेळी झाली होती. मात्र, या वेळी महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर करण्यात आली नाही. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाखो बहिणींच्या खात्यावर पैसेही जमा करण्यात आले आहेत. यासह राज्यातील विविध घडामोडी एका क्लिकवर.