उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात सन २०२२-२३ चा तथा महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी शेती क्षेत्राला ठेवण्यात आले असून सहकार, सिंचन, फळशेतीसाठी सरकारने भरीव तरतूद केली आहे. तसेच अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पंतप्रधान पीकविम्या ऐवजी अन्य पर्याय शोधण्याचा विचार बोलून दाखवला.

शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करु

Union Budget 2025
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Union Budget 2025
Union Budget 2025 : “हे बजेट भारताचे नाही तर…”, निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका
Union Budget Of India 2025
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाचा अफगाणिस्तान, मालदीवलाही फायदा; नेमकी काय आहे निर्मला सितारमण यांची घोषणा
Budget 2025
Budget 2025 : तुमचा वार्षिक पगार १२ लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होणार? समजून घ्या सोपं गणित
Share Market Budget 2025
India Budget 2025 Updates : तुमच्याकडेही आहेत का हे शेअर्स? अर्थसंकल्प जाहीर होताच झोमॅटोसह ‘या’ स्टॉक्समध्ये तेजी
Devendra Fadnavis On Sarpanch Santosh Deshmukh Case
Budget 2025: ‘भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक
Budget 2025 News
Budget 2025 : निर्मला सीतारमण सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, ‘या’ सात घोषणांची शक्यता!

“गुजरात तसेच अन्य काही राज्ये पंतप्रधान पीकविमा योजनेतून यापूर्वीच बाहेर पडली आहेत. महाविकास आघाडी सरकारने या योजनेत बदल करण्याची विनंती केली आहे. ती मान्य नाही झाली तर, शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाईसाठी आम्ही अन्य पर्यायांचा विचार करु,” असे अजित पवार म्हणाले.

गुजरात राज्याचा दिला दाखला

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत शेतातील पिकाचा विमा उतरवण्यात येतो. मात्र या योजनेतून गुजरातसारखे राज्या आधीच बाहेर पडलेले आहेत. असे असताना आता सभागृहातच अजित पवार यांनी अन्य पर्यांयाचा विचार बोलून दाखवल्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्याच्या पीक नुकसान भरपाईसाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेती क्षेत्रासाठी भरवी तरतूद

तर दुसरीकडे आज राज्य सरकारने शेती क्षेत्राठी भरीव तरतूद केली. सरकारने भूविकास बँकेच्या ३४ हजार ७८८ कर्जादार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भूविकास बँकेच्या जमिनी व इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार आहे. वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार असून या संशोधन केंद्रामध्ये हळद पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधन करण्यात येईल. त्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील शेतीच्या विकासासाठी तीन वर्षांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Story img Loader