मुंबई : देश- विदेशातील गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी नव्या सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी उद्याोग विभागास दिल्या होत्या. त्यानुसार देश- विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी, त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Startup Ecosystem State wise Startup Growth and Loan Disbursement Trends
स्टार्टअप्सना बळकटी मिळण्याची आशा
Increase in foreign direct investment in insurance sector in the budget
कीमत जो तुम चाहो
China obstacle to becoming the world manufacturing hub
जगाचे उत्पादन केंद्र बनण्यात चीनचा अडसर
Disabiled people protest , pune , police headquarters,
पुणे : दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यांसाठी पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन, अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना

हेही वाचा : Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”

राज्य सरकार व प्रमुख उद्याोग गटांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने औद्याोगिक समन्वय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती उद्याोग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गुंतवणूक वाढविण्यासाठी…

● राज्यात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात येत आहे. याद्वारे गुंतवणुकीच्या दृष्टीने सातत्याने सहकार्य देण्यात येईल.

● आजपर्यंत झालेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी जलद गतीने करण्यात येईल.

● महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. याअंतर्गत बहुपक्षीय संस्थांशी आणि विकास बँकांशी सहकार्य वाढवणे, दूतावास व व्यापार संघटनांशी समन्वय वाढवणे, महाराष्ट्रातील मराठी प्रवासी समुदायाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, कापड, ऑटोमोबाईल आणि औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा : बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली

● या नव्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ, मैत्री कक्ष व उद्याोग संचालनालय सक्रिय भूमिका बजावणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात येणार आहे.

Story img Loader