Maharashtra News: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर देशभरातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा केल्यामुळे त्यांना रिटर्न गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प हा चर्चेचा विषय ठरला आहे.