Mumbai Maharashtra News Updates, 29 August 2024: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजाचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी हे सगळं सरकारचं पाप असल्याची टीका केली असताना सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुतळ्याच्या दर्जासाठी नेमकं कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत दोन्ही बाजूंकडून बहुमताचे दावे केल जात असून सत्ताधाऱ्यांनी पराभवाच्या भीतीमुळेच निवडणुका पुढे ढकलल्याची टीका केली जात आहे.