Mumbai Maharashtra Today, 31 August 2023: भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत आज आणि उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला २८ राजकीय पक्षांचे एकूण ६३ प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये ११ मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी, प्रवरानगर दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही नेते प्रवरानगर येथील ‘राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच आज मुंबईत जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जाणार आहे. नीती आयोगाच्या बैठकीतील निर्णयावरून शरद पवार गट आक्रमक झाला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर वाचा…
Marathi Breaking News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. ही सुनावणी १ सप्टेंबरला होणार होती. मात्र, कामकाजाच्या वेळापत्रकात या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी आता नंतर होणार आहे. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.
अजित पवार यांच्याकडून फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे न जाता फडणवीस यांच्या माध्यमातून जाणार आहे. हा एक प्रकारे अजित पवारांचे पंख छाटण्याचाच प्रयत्न असल्याची कुजबुज मंत्रालयाच्या वर्तुळात सुरू आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवारी मुंबईत मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावरील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले. या प्रकल्पग्रस्तांचे नेमके प्रश्न काय आहेत, त्यावर अद्याप तोडगा का निघू शकला नाही, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
झोपु योजनेत पारदर्शकता येईल असा दावा केला जात आहे. ही ऑनलाइन सोडत नेमकी कशी असेल आणि त्यामुळे झोपडीधारकांना कसा फायदा होईल याचा हा आढावा…
अकोला : मध्य रेल्वेकडून गेल्या पाच महिन्यांत ५७ लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या चालविल्या जात आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यामुळे रेल्वे विभागांमध्ये क्षमतेच्या कमतरतेच्या समस्येवर अतिशय प्रभावी उपाय मिळतो. अधिक गाड्यांसाठी ‘लूप लाईन’ तयार केली जात आहे. यामध्ये भुसावळ विभागातून २३, तर नागपूर विभागातून ३४ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात आहेत.
नागपूर : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात सापडलेल्या अपंग मुलीला (रूपा) समाजसेवक शंकरबाबा पापडकर यांनी स्वत:चे नाव देत तिचे पालन केले. रुपाची प्रकृती खालावल्यावर तिला मेडिकल रुग्णालयात दाखल केले गेले. येथे तिच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून येथे सर्वच डॉक्टर तिच्यावर विशेष लक्ष देत आहेत. रक्षाबंधनाला रुपाने मेडिकलच्या निवासी डॉक्टरांना राखी बांधली.
नागपूर : पिपळा-बेसा रोडवरील अथर्व नगरीतील एका सदनिकेत राहणाऱ्या एका दाम्पत्याने घरी काम करण्यासाठी आणलेल्या ७ वर्षीय मुलीच्या छातीला आणि खासगी जागेवर सिगारेटचे चटके देऊन अनन्वित छळ केला.
अमरावती: सासरच्यांनी जावयाची मान पिरगळून हत्या केल्याची घटना चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. ही घटना गेल्या १४ जून रोजी चुनखडी येथे घडली होती. आपल्या पतीला माहेरकडील लोकांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.
राज्यातील उच्च न्यायालयावरील भार कमी व्हावा तसेच राज्यातील प्रशासकीय बाबींचे वाद लवकर सुटावे, या उद्देशाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची (मॅट) स्थापना करण्यात आली.
मुंबईत डरपोकांचा मेळावा “घमेंडीया” नावाने संपन्न होत आहे. ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला… ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर गोळ्या झाडल्या, अशा सगळ्यांचे महाराष्ट्रात उबाठा वाजत गाजत जोरदार स्वागत करीत आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मोदक आणि पंचपक्वान्नाचे पंचतारांकित जेवण घालून त्यांची तोंडं गोड करीत आहेत. पंगती बसू दे आणि जेवणावळीही उठू दे… फक्त काल-परवा पर्यंत स्वाभिमानाने जगणाऱ्यांना… महाराष्ट्र द्रोह्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलताना जनाची नाही, किमान मनाची तरी वाटू दे!
मुंबईत डरपोकांचा मेळावा "घमेंडीया" नावाने संपन्न होत आहे.
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 31, 2023
◆ज्यांनी ज्यांनी काल-परवा पर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा द्वेष केला…
◆ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांवर…
सांगली: उमदी (ता. जत) येथील आश्रमशाळेतील विषबाधेप्रकरणी संस्थेच्या सचिवासह पाच जणांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून समाज कल्याण विभागाने चौघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील ३८८ जागांसाठी राज्यातील २६ शहरातील ९८ केंद्रांवर टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) माध्यमातून २६, २७ आणि २८ मे रोजी परीक्षा झाली.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना नाममात्र दरात जिप्सीसारख्या वाहनात बसून व्याघ्र पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.
अक्षय ठुबे हे वसंत विहार येथील धर्मवीर नगर परिसरात राहतात. ते शिंदे गटात असून तेथील उपशाखा प्रमुख आहेत.
उरण ते खारकोपर लोकल सेवा सुरू होण्याची उत्सुकता वाढलेली असतानाच उरणच्या प्रवासी व नागरिकांची ही सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी इच्छा आहे.
गडचिरोली : जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पहिली ते आठव्या वर्गासाठी सुरू केलेला ‘फुलोरा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना अभासक्रमापासून दूर नेणारा आहे. त्यामुळे सदर उपक्रम बंद करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना पत्र लिहून दिले आहे.
वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आदिवासी आश्रमशाळेत शिवम उईके या बारा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तो मेळघाट येथील डोमा गावचा रहिवासी होता.
नागपूर : बांधकामाच्या क्षेत्रात अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या महामेट्रोला आता कामातील त्रुटींमुळे नामुष्कीला तोंड द्यावे लागत आहे. नागपुरात कामठी मार्गावर गड्डीगोदाममधील आणि वर्धा मार्गावरील मेट्रोच्या पुलाला तडे गेल्याने त्यावरून धावणाऱ्या मेट्रोची गती कमी करण्यात आली आहे.
पुणे : पोटदुखीचा त्रास होत असल्याने एक रुग्ण रुग्णालयात आला. त्याची तपासणी केल्यानंतर त्याचे छाती व पोटातील अवयव सर्वसाधारणा व्यक्तीच्या विरुद्ध दिशेला असल्याचे निदर्शनास आले. ही दुर्मीळ जनुकीय समस्या असून, तिला साईटस इर्न्व्हसस असे म्हणतात.
पुणे : सौदी अरेबियात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ९० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी : ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या’ हा संदेश जगभरातील लोकांना देण्यासाठी पिंपळे निलखमधील विवेक सोनवणे हे पत्नी व दोन मुलांसह मोटारीने पिंपरी-चिंचवड ते लंडन असा प्रवास करणार आहेत.
नागपूर: शहरातील युवावर्ग गजबजलेल्या भागातील मोठ्या झगमगाटात सुरू असलेल्या हुक्का पार्लरच्या वाटेवर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तरुण-तरुणींचे घोळके हुक्का पार्लरमध्ये धूर उडवत आनंद घेत असल्याचे चित्र पहायला मिळते.
नागपूर: सिव्हिल लाईनमध्ये राहणाऱ्या माजी न्यायाधीशांच्याच घरी एका अट्टल चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून लढेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याने पिंपरी-चिंचवडमधील विद्यमान लोकप्रतिनिधींनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने राजकीय खेळी केल्या जात आहेत. दरम्यान, अजित पवार यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी कोणता कानमंत्र दिला आहे का? या प्रश्नावर रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आमदार रोहित पवार हे शरद पवार गटाची भूमिका प्रखरपणे मांडताना दिसत आहे. असं असलं तरी सत्तेत सहभागी होण्यापूर्वी अजित पवारांनी रोहित पवारांना ऑफर दिली होती का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. यावर आता रोहित पवारांनी स्वत: उत्तर दिलं आहे.
मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीपूर्वी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली…