Maharashtra Politics Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच आज खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तसेच वाल्मिक कराड याचं एक सीसीटीव्ही फूटेज नुकतंच समोर आलं असून वाल्मिक कराडसोबत इतर आरोपी दिसत आहेत. त्यामुळे हा मुद्दाही चर्चेत आला आहे. तसेच दुसरीकडे सैफ अली खानवरील हल्ला आणि त्याचा हल्लेखोर यासंदर्भात मोठी चर्चा सध्या सुरु आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केलंलं आहे. दरम्यान, या बरोबरच २२ जानेवारी रोजी जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरही आता प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai Maharashtra News LIVE Update: राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
“मावा नाटे मावा राज” चळवळीचा आधारस्तंभ हरपला, मोहन हिराबाई हिरालाल यांचे निधन
नागपूर : लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करुन देणारे आणि पर्यावरण व वनाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांनी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
नाशिकच्या पालक सचिवपदी एकनाथ डवले
नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची नाशिकच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील कुंभमेळ्यात डवले हे नाशिकचे विभागीय आयुक्त होते. त्यांच्या या अनुभवाचा उपयोग आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनात करण्याच्या दृष्टीने सरकारने ही नियुक्ती केल्याचे मानले जाते.
सध्या ग्रामविकास विभागाची जबाबदारी सांभाळणारे डवले हे २०१४ ते २०१७ या कालावधीत नाशिकचे विभागीय आयुक्त होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन झाले. हा धागा पकडून सरकारने त्यांची नाशिकच्या पालक सचिवपदी नियुक्त केली.
पनवेलमधील कचरा संकलन कार्याला गती मिळणार
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल शहर आणि कळंबोली उपनगर या दोन ठिकाणी बंदीस्त स्वरुपात नागरी घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीचे संकलन प्रकल्प बांधले जाणार आहेत. यासाठी २६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रकल्प केंद्राजवळील नागरीवस्तीला या प्रकल्पाचा त्रास होऊ नये असा या प्रकल्पाचा उद्देश असून या दोन केंद्रांमुळे संकलित केलेला कचरा घोट गाव येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत नेण्यात येण्यासाठी लागणारा वेळ आणि इंधनावरील खर्च पालिकेचा वाचणार आहे. सोमवारी हे केंद्र बांधण्याच्या कामासाठी २६ कोटी रुपयांच्या खर्चाला नगरविकास विभागाचे उपसचिवांनी परिपत्रकाव्दारे मंजूरीचे आदेश दिले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत पनवेल महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सोमवारी राज्याच्या नगरविकास विभागाने मंजूरी दिली. पालिका क्षेत्रात सध्या ४०० मेट्रीक टन कचरा शंभर लहान वाहनांमध्ये जमा करुन तो घोट येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत पोहचवला जातो. यासाठी पालिका दरवर्षी कचरा संकलन आणि वाहतूकीवर सूमारे ३० कोटी रुपये खर्च करते. नवीन पनवेल आणि कळंबोली या उपनगरालगत बंदीस्त स्वरुपात शास्त्रोक्तपद्धतीने कचरा संकलन केंद्र ( स्थलांतरण स्थानक) उभारल्यानंतर तो कचरा दाबयंत्राने लहान आकाराचा करुन मोठ्या वाहनातून घोट येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत पोहचवला जाईल. पालिकेला कच-याचे वर्गीकरण नागरिकांनी घरातून किंवा गृहनिर्माण सोसायट्यांनी करुन दिल्यास या ट्रान्सफर स्टेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च व वेळ वाचेल अशी माहिती पालिकेचे आरोग्य व स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली.
मोरा-मुंबई रो रो सेवा मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित; अनेक महिने बंद असलेले काम पुन्हा सुरू
मोरा ते मुंबई व दरम्यान रो रो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम २०१८ सालापासून रखडले आहे. त्यानंतर जेट्टीचे काम अनेक महिने बंद होते. या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचा दावा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. सविस्तर वाचा
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बांगलादेशींच्या मुद्द्याची व्यूहरचना; भाजप. शिवसेना, एमआयएमला विषय मिळाला
माहिती आधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांचा आधार घेत आरोप करण्याच्या कार्यशैलीतील ‘अग्रेसर’ असणारे भाजपचे किरिट सोमय्या यांनी सिल्लोड मतदारसंघात बांगलादेशी मुस्लिम आले आहेत व त्यांना चार हजार ७३० बनावट जन्म – मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेल्याचा आरोप केला. सविस्तर वाचा
अदानीविरोधात कुर्लावासीय रस्त्यावर; मदर डेअरीचा जागा धारावीसाठी देण्यास तीव्र विरोध
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मुलुंड, कुर्ला,अक्सा आणि अन्य ठिकाणच्या जागा नाममात्र दरात धारावी पुनर्विकास प्रकल्पास (डीआरपी) दिल्या जात आहेत. कुर्ल्यातील मदर डेअरीची काही एकर जागा धारावीसाठी देण्यास कुर्ल्यातील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे.
“दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होत असेल तर…”, शरद पवार आणि अजित पवारांबाबत रोहित पवारांचं मोठं विधान
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंददाराआड चर्चा झाल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं की, “एखादी चर्चा होत असेल पण बंद दाराआड काय चर्चा होते हे आपल्याला सांगता येणार नाही. मात्र, मी एवढंच सांगतो की जर दोन पक्ष असतील, त्यामध्ये एक पक्ष सत्तेत असेल आणि एक विरोधी पक्षात असेल आणि दोन पक्षात सकारात्मक चर्चा होत असेल त्यात जर दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
गँगस्टर डीके रावसह सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा, गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : हॉटेल व्यावसायिकाकडे अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गँगस्टर डी. के. रावसह सात जणांविरोधात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
शरद पवार यांच्या बाजूला बसणे अजित पवारांनी टाळले, नावाची प्लेट बदलण्यास…
पुणे : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
अवैध गर्भपाताची माहिती देणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ – आबिटकर
कोल्हापूर : अवैध गर्भपात प्रकरणी शासन गांभीर्याने कार्यवाही करत असून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याच्या साहाय्याने प्रकरण मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे.
जिल्हा बँक नोकरभरती : परीक्षा केंद्र बदलल्याने आर्थिक भुर्दंड, परीक्षार्थीचा आरोप…
चंद्रपूर : चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक आणि शिपाईपदाच्या ऑनलाइन परीक्षेत पहिल्याची दिवशी बिघाड झाल्याने केंद्र बदलण्यात आले. यामुळे परीक्षार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असा आरोप परभणीचे दत्ता पौळ यांनी केला.
तुरीचे दर घसरणीला, तरीही शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ
अमरावती : खरीप हंगामातील सोयाबीनच्या घटत्या दराने शेतकऱ्यांची घोर निराशा केली असताना आता तुरीच्या दरालाही उतरती कळा लागली आहे. महिन्याभरापूर्वी तुरीला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये दर होता त्यावेळेस सोयाबीनची भरपाई तुरीतून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तुरीचे दर हमीभावापेक्षा खाली आले आहेत.
ठाणे जिल्ह्यात उत्पन्न दाखले मिळेना, कारवाईच्या भितीमुळे तलाठींनी दाखले काम केले बंद
ठाणे : तलाठींच्या अहवालानुसार दाखला देण्यात येत असल्याचा उल्लेख उत्पन्नाच्या दाखल्यावर केला जात असल्यामुळे त्यात खोटी माहिती आढळल्यास तलाठींवर कारवाई होते. या कारवाईच्या भितीमुळे तलाठींनी उत्पन्न दाखल्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम बंद केले असून यामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उत्पन्न दाखल्यांचे काम ठप्प झाले आहे.
ठाणे : प्रत्येक महिन्यात १९ ते २० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू
ठाणे : ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या क्षेत्रात २०२४ या वर्षभराच्या कालावधीत २३० जणांचा अपघाती मृत्यू तर ६०८ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. मृतांच्या अपघाताची सरासरी केल्यास प्रत्येक महिन्यात किमान १९ ते २० जणांना प्राण गमवाला लागत आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ या वर्षात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. २०२३ मध्ये २०० जणांचा मृत्यू झाला होता.
स्वदेशी मिल्स अवसायानात काढण्यास दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबई : स्वदेशी मिल्स कंपनी लिमिटेडच्या अवसायानात काढण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. त्यामुळे, ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.
टोरेस कंपनीच्या १००० कोटींच्या फसवणूक प्रकरणात ईडीची मोठी कारवाई
मुंबईमधील दादर परिसरात टोरेस नावाच्या कंपनीनं कमी कालावधीत पैसे दुप्पट करुन देण्याचं अमिश दाखवत गुंतवणुकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकारानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात काहींना अटक करण्यात आलेलं आहे. दरम्यान, आता या फसवणुकीच्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) एन्ट्री केली आहे. आता ईडीने मोठी कारवाई करत मुंबई आणि जयपूरमधील तब्बल १० ठिकाणी छापेमारी केली आहे.
एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
“एसटीच्या तिकीटाच्या दरात वाढ करण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. मात्र, एक आहे की एसटी महामंडळाच्या ज्या बस आहेत. त्यामध्ये चांगल्या बससाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मग त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रताप सरनाईक आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता उद्या जर एसटीच्या तिकीट दरात वाढ करायची म्हटलं आणि जर एसटीबसेस खराब असतील तर लोक म्हणतील की बस खराब आहेत, मग कुठे भाडेवाढ करता? त्यामुळे आम्ही एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या संदर्भात चर्चा करू आणि योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बांगलादेशींच्या मुद्द्याची व्यूहरचना; भाजप. शिवसेना, एमआयएमला विषय मिळाला
माहिती आधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांचा आधार घेत आरोप करण्याच्या कार्यशैलीतील ‘अग्रेसर’ असणारे भाजपचे किरिट सोमय्या यांनी सिल्लोड मतदारसंघात बांगलादेशी मुस्लिम आले आहेत व त्यांना चार हजार ७३० बनावट जन्म – मृत्यूचे प्रमाणपत्र दिले गेल्याचा आरोप केला. सविस्तर वाचा…
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची मदत जाहीर, रेल्वे मंत्रालयाची घोषणा
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ २२ जानेवारी रोजी मोठा रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, आता भारतीय रेल्वेने या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
शरद पवार गटाचे प्रमोद गायकवाड यांच्याविरुद्ध आणखी एक तक्रार
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांच्या विरोधात एका वयोवृद्ध महिलेने तिच्या मालकीच्या भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या मुद्द्यावर धमकवल्याची फिर्याद पोलिसांत नोंदविली आहे. गायकवाड हे एका तरुणाच्या हत्येसह इतर काही गुन्ह्यांमध्ये सध्या अटकेत आहेत.
सुगलाबाई मल्लिकार्जुन कुंभार (वय ७७) यांच्या मालकीचा शहरातील कुमठा नाका येथे कल्लप्पा म्हेत्रे वस्तीत भूखंड आहे. हा भूखंड त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला नुकताच विकला असून, त्याप्रमाणे भूखंडाचा ताबा देण्यासाठी त्या प्रत्यक्ष भूखंडाच्या ठिकाणी गेले असता तेथे त्यांना धमकवण्यात आल्याचे त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार प्रमोद गायकवाड यांच्यासह अन्य काहीजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सुगलाबाई कुंभार यांना त्यांच्या मालकीच्या जागेत घुसून आरोपींनी त्यांना धमकावले. तुम्ही कोणीही यायचे नाही. या भूखंडावर काही केले तर याद राखा, तुम्हाला जे काही सांगायचे असेल तर प्रमोद गायकवाड त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेटा, असे म्हणून सुगलाबाई कुंभार यांना त्यांच्या मालकीच्या भूखंडातून पळवून लावण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सैफ अली खानवरील हल्याबाबत मंत्री नितेश राणे यांचे यांचे मोठे विधान, म्हणाले…
‘अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेला बांगलादेशी होता. सैफ व्यवस्थित चालत येत होता. त्यामुळे सैफवरील हल्ला संशयास्पद आहे. त्याने स्वत:च चाकू मारून घेतला की काय,’ अशी शंका राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आळंदीतील हिंदू महोत्सव कार्यक्रमात बुधवारी व्यक्त केली. सविस्तर वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण किती? वैद्यकीय विभागाने काय केले आवाहन?
पिंपरी-चिंचवड शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे आठ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बरे झालेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. वायसीएम रुग्णालयात तीन तर खासगी रुग्णालयात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा
शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद; कोथरुड, बाणेर, कर्वेनगर भागातील घटना
गेल्या काही महिन्यांपासून शहरात महिलांचे दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांची धाडस वाढले असून, सोसायटीच्या आवारात शिरुन दागिने चोरून नेल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. सविस्तर वाचा
“सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांना ‘खान’ कलाकारांची चिंता”, हिंदू कलाकारांच… ; नितेश राणे
अभिनेता सैफअली खान ला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल आहे. मंत्री नितेश राणेंनी देखील मत व्यक्त करत सैफ अली खानवर खरच चाकू हल्ला झाला होता. की सैफअली खान ने केवळ अभिनय (एक्टिंग) केला आहे. सविस्तर वाचा
पिंपरी : अग्निशमन दलाचे सुसज्ज मुख्यालय; संग्रहालय, प्रेक्षागृहा आणि वाहनतळ
शहराचा विस्तार वाढत असल्याने महापालिकेच्या वतीने पिंपरीतील गांधीनगरसमोरील महिंद्रा कंपनीच्या जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. सविस्तर वाचा
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद विकोपाला का गेले? राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मनोमीलन का नाही?
पालकमंत्री मुद्द्यावरून रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे तिन्ही आमदार आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यावरून आक्रमक झाले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय जर्सीवर पाकिस्तानचे नाव… आधी नकार, मग होकार! नक्की प्रकरण काय?
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद गेल्यापासून अनेक गोष्टींचा सामना त्यांना करावा लागत आहे. आयोजन स्थळांना तयार करण्यास लागलेला उशीर चर्चेचा विषय ठरला. सविस्तर वाचा
भारतात १७ वर्षांपासून बेकायदा राहणाऱ्या अफगाणी नागरिकाला मायदेशी पाठविण्याचे आदेश
भारतात बेकायदेशीररित्या १७ वर्ष वास्तव्याला असलेल्या अफगाणिस्तानमधील नागरिकाला मायदेशी पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हबीबुल्ला प्रांग हा अफगाण नागरिक आपली ओळख लपवून भारतात राहात होता. सविस्तर वाचा
“एका चहा विक्रेत्याने आग लागल्याची ओरड केली अन्…”, जळगाव रेल्वे अपघाताच्या घटनेचं कारण अजित पवारांनी सांगितलं
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ २२ जानेवारी रोजी मोठा रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, हा अपघात नेमकं कसा घडला? या अपघातासाठी कोण जबाबदार आहे? याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२३ जानेवारी) माध्यमांशी बोलताना दिली. ‘एका चहा विक्रेत्याने रेल्वेतील एका डब्यात आग लागल्याची ओरड केली. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून खाली उड्या मारल्या. मात्र, ही घटना फक्त आणि फक्त अफवांमुळे घडली’, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजार संसर्गजन्य आहे का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेत महत्वाची माहिती दिली आहे. अजित पवार यांनी म्हटलं की, “पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या आजारासंदर्भात आढावा घेतला आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. मी सिव्हिल सर्जन यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये काळजी घेणं महत्वाचं आहे. या आजाराबाबत बऱ्याच अफवाही पसरवल्या जात आहेत. मात्र, एक गोष्ट खरी आहे की गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या आधी ३३ ते ३४ पर्यंत होती, ही संख्या ५९ पर्यंत गेली आहे. यातील बहुतेकजण पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
सैफ अली खान हल्ला प्रकरणात महत्वाची माहिती समोर; तलावात दीड तास शोधाशोध अन् पोलिसांच्या हाती मोठा पुरावा (फोटो-संग्रहित छायाचित्र)