Mumbai Pune Live Updates Today, 30 September 2024 : राज्यात नुकताच धर्मवीर-२ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यावरून आता राजकारणदेखील तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे हे आनंद दिघे यांचे खच्चीकरण करत होते, असा आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. यानंतर आता ठाकरे गटाकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काल नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झालं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका केली. या टीकेला आज शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील इतरही घडामोडींवर आपलं लक्ष राहणार आहे.
Maharashtra News Live Today, 30 September 2024 : अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज उदगीरमध्ये
नागपूर: अतिशय गजबजलेल्या चौकात संजुबा माध्यमिक शाळा असल्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांची मोठी कसरत सुरू आहे. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला वाहतुकीची कोंडी व पालकांची गर्दी होत असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. भविष्यात त्या चौकात एखादी अनुचित घटना घडण्याची वाट वाहतूक पोलीस बघत आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नागपूर: विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, पण कुणी हाती लागत नाही. विदर्भात पाचशे, हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करायला कुणी तयार नाही होत आहे. प्रत्येक वेळी अंबानी-टाटा यांना बोलविता नाही येत. विदर्भात मोठी गुंतवणूक आली नाही तर विदर्भाचा विकास कठीण आहे, अशी कबुली स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली.
पुणे : कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातील काच कारखान्यात रविवारी दुपारी अवजड काचा उतरविताना झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला, तसेच दोघे जण गंभीर जखमी झाले.
नागपूर: विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, पण कुणी हाती लागत नाही. विदर्भात पाचशे, हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करायला कुणी तयार नाही होत आहे. प्रत्येक वेळी अंबानी-टाटा यांना बोलविता नाही येत. विदर्भात मोठी गुंतवणूक आली नाही तर विदर्भाचा विकास कठीण आहे, अशी कबुली स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली .
अलिबाग : दोन वर्षापूर्वी लागेल्या आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि नुतनीकरणायासाठी राज्यसरकारने तब्बल ९ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
आनंद दिघे यांना मारण्यात आलं होतं, त्यांचा घातपात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा पैसे देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीच्या घटना समोर येत असून पाच जणांची तब्बल एक कोटी ९४ लाख ८२ हजार ८०४ रुपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली.
वर्धा: शालेत विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. त्याची नोंद घेत महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेत सिसिटीव्ही लावण्याचे आदेश दिले. पण आता एका मंडळाने अशी निगराणी नसणाऱ्या शाळेत परीक्षेचे केंद्रच नं देण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचे शिंदे सरकारवर टीकास्र
सध्या लाडकी बहिणी योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून ही योजना उद्याच्या निवडणुकीत मिंधे गटाला मत मिळवण्यासाठी आहे. मत विकत घेण्याची ही योजना आहे. त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे आणि प्रकल्पांचे पैसे या फक्त एका योजनेकडे वळविण्यात आले आहेत. त्यावरून तिघांमध्ये श्रेय वादाची लढाई सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना पत्र पाठवले आहेत. त्यात मुख्यमंत्री असा शब्द वापरण्यात आलेला नाही. त्यामुळे गडकरी म्हणत आहेत, ते बरोबर आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात अफू विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५६ लाख ९० हजार रुपयांची दोन किलो ८४५ ग्रॅम अफू जप्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशावरून अंबादास दानवे यांचे शिंदे सरकारवर टीकास्र
१५ ऑगस्ट २०२४ पर्यंत ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ २४ लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे, महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षण मंत्री @dvkesarkar जी. विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून… pic.twitter.com/cvjQtemrhR
— Ambadas Danve (@iambadasdanve) September 30, 2024
आदिवासी आमदारांचे आजपासून मंत्रालयासमोरील गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन
राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह राज्यातील सर्व आदिवासी आमदार आजपासून मंत्रालयासमोरील गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करणार आहे. सकाळी १० वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. आंदोलनात राज्यातील विविध आदिवासी संघटना सहभागी होणार आहेत. आदिवासी आरक्षणामधून धनगरांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
थोड्याच वेळात राज्यमंत्रिमंडळाच्या बैठक
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा उदगीरमध्ये दाखल होणार आहे. यावेळी उदगीरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात्रेदरम्यान महिलांसाठी विशेष मेळावाही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.