Maharashtra News Updates: महाराष्ट्रात द केरला स्टोरी सिनेमावरून वाद सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उशिरा यावरून प्रतिक्रिया दिली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरूनही वाद होतो आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधले नेते एकमेकांवर टीका करत आहेत. नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवर असा वाद रंगला आहे. तर आज कर्नाटक विधानसभा निवडणूक होते आहे. याबाबतही विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करत कर्नाटक निवडणुकीत बदल घडणार असं म्हटलं आहे. तर कर्नाटकातही काँग्रेसकडून सत्ता बदल होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.