Mumbai News Updates : महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप करत राज्यात विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत सरकारचे सर्वच बडे नेते हे आरोप फेटाळत आहेत. तसेच मविआ सरकारच्या काळातच उद्योग केल्याचा आरोप करत आहेत. एकूणच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दुसरीकडे राज्यातील पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत. त्या मुद्द्यावर विरोधकांकडून ओला दुष्काळ घोषित करण्याचीही मागणी होत आहे. राजकारणासह राज्यातील सर्वच घडामोडींच्या अपडेट्सचा आढावा एका क्लिकवर…