Mumbai- Maharashtra News Updates, 08 September 2022 : महाराष्ट्रात दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवरील सजावटीवरून राजकारण तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याशिवाय राज्यात पावसाचीही जोरदार हजेरी आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…
Maharashtra Updates 08 September 2022 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट
डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील नवनीत नगर भागात पाच ते सहा हजार नागरिकांची वस्ती आहे. या भागातील नागरिकांना वेळेवर केडीएमटी बस सुविधा नाही. रिक्षा चालक मनमानीने भाडे आकारत आहेत. नवनीत नगर परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडला असताना पालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही, अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या.
विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळखीनंतर लग्न ठरलेल्या नवरदेवाने होणाऱ्या पत्नीकडून तीन लाख रुपये उकळले. त्यानंतर तिला लग्नास नकार दिला. याप्रकरणी सदर पोलिसांनी सुमित महादेव बोरकर (४०, रामनगर, गोंदिया) याला अटक केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भात शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, त्यांना जिल्ह्यात पदाधिकारी सापडत नसून फक्त तिघांनाच नियुक्त्या दिल्यावरून उघडकीस आले आहे. चौथा पदाधिकारीसुद्धा त्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोर गटाची आहे.
दुबईतून हातोडा आणि छन्नीच्या स्वरूपात सोने तस्करी करून नागपुरात आणणाऱ्या गोरखपूरच्या एका व्यक्तीला नागपुरात तिघांनी पाठलाग करून लुटले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली.राहुल यादव (आजमगढ), अक्रम मलिक (नागोर, राजस्थान), ईरशाद खान (नागोर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
वरंब्या गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर सीटी १ वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील उसेगाव परिक्षेत्रात ही घटना घडली.प्रेमपाल तुकाराम प्रधान (४५, रा. उसेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ज्येष्ठअभिनेते नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर जाऊन गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही आज सकाळी साडेसातच्या सुमारास पाटेकर यांच्या फॉर्मवर जाऊन भेट घेतली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजाराचे कामकाज अनंत चतुर्दशीच्या दिवशी (९ सप्टेंबर) नियमित सुरु राहणार आहे. मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, फुल बाजाराचे कामकाज शुक्रवारी (९ सप्टेंबर) सुरू राहणार आहे.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये यंदा गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक पाऊस ऑगस्टअखेरपर्यंत पडला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सन २०२० आणि सन २०२१ या दोन वर्षांत ऑगस्टपर्यंत पडलेल्या पावसापेक्षा यंदा जास्त पाऊस पडला आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात गणपती मंडळांना भेटी देण्याचा सपाटा सर्व पक्षीय नेत्यांचा सुरू आहे. आज माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मनसेचे अमित ठाकरे हे पिंपरी-चिंचवड शहरातील गणपती मंडळांना भेट देणार आहेत.
राज्यभरात बुधवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
“तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं” असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका केली होती. या टीकेवर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पलटवार केला आहे.
१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह आहे, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रिजवर पहाटे २ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात
टेम्पो ट्रॅव्हलरमधील एकूण २२ प्रवाशांपैकी १४ प्रवासी जखमी झाले आहेत. कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना हा अपघात झाला आहे.
“तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं” असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका केली होती. या टीकेवर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पलटवार केला आहे. “उद्धव ठाकरेंना एकेरी भाषेत बोलण्याची नवनीत राणा यांची लायकी नाही. शिवसेनेच्या नादाला लागल्यास आगामी २०२४ मधील निवडणुकीत आम्ही राणांना त्यांची जागा दाखवून देऊ”, अशी टीका वानखेडे यांनी केली आहे.
एक एक करून गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती गुजरातला हलविण्यात येत आहे. तरीही या भागातील लोकप्रतिनिधी कृती करण्याऐवजी केवळ माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात धन्यता मानत असल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. समजमाध्यमांवर या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीभोवती टाइल्स आणि एलईडी लाइट्स लावण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारवाई करण्यात आली. दरम्यान, यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. एकीकडे भाजपाने महाविकास आघाडीच्या कार्यकाळात हे सुशोभीकरण करण्यात आल्याने उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसनेही याकुब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे का सोपवला? अशी विचारणा केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक अज्ञात व्यक्ती सुरक्षा भेदत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शाह आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील खासदाराचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.
आशिया कपमध्ये बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघामध्ये पार पडलेल्या सामन्यात मैदानातच खेळाडू भिडल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद याच्यावर बॅट उगारल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला. यानंतर अफगाणिस्तानच्या काही खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. पण मैदानातील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीभोवती टाइल्स आणि एलईडी लाइट्स लावण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारवाई करण्यात आली. दरम्यान, यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. एकीकडे भाजपाने महाविकास आघाडीच्या कार्यकाळात हे सुशोभीकरण करण्यात आल्याने उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसनेही याकुब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे का सोपवला? अशी विचारणा केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक अज्ञात व्यक्ती सुरक्षा भेदत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शाह आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील खासदाराचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर कारवाई केली आहे. कोविड काळात मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. यावरून वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या.
मुंबई महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अपडेट, महाराष्ट्र न्यूज अपडेट