Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते त्यांच्या सातारा येथील गावी गेले आहेत. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पार पडलेल्या गुप्त बैठकीनंतर महाराष्ट्र म्हणजे गंमत जंमत नाही असं म्हणत सामनातून अग्रलेख लिहित टीका करण्यात आली आहे. तर शिंदे गटातले दहा आमदार नाराज असून ते ठाकरे गटात परतू शकतात असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसंच त्यांना परत आपल्या गटात घ्यायचं की नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंचा असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण २०१९ पासून निरनिराळ्या वळणांवर गेलं आहे. अगदी मागच्याच महिन्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. तिथपर्यंत ही वळणं येतच होती. अशात आता पुढे आणखी काही घडामोडी घडणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच राज्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.