Mumbai News Updates Today : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणालाही वेग आला आहे. महाविकासआघाडीतील घटकपक्षांकडून बैठका घेऊन महाराष्ट्रातील रणनीती ठरवली जात आहे. यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसह मुंबई महानगरपालिका निवडणुकीचाही समावेश आहे. दुसरीकडे शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा फक्त एका क्लिकवर…
Maharashtra News Updates Today: राजकारणासह महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा वेगवान आढावा फक्त एका क्लिकवर…
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी सरकारविरोधात बोलण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार असल्याचं म्हटलं. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारवर झालेल्या टीकेचंही उदाहरण दिलं. त्यांच्यावर सरकारविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर ते मंगळवारी (१६ मे) न्यायालयासमोर हजर राहिले. यानंतर न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.
अनेक सामाजिक कार्यकर्ते अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करत असताना काही राजकीय व्यक्ती ज्योतिषी, बुवा-बाबा यांच्या आहारी गेलेले पाहायला मिळतात. हे राजकीय नेते निवडणुकीच्या अर्जापासून अनेक महत्त्वाचे काम बुवा-बाबांच्या सल्ल्यानुसारच करतात. मात्र, नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशकार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी याला अपवाद ठरले. कर्नाटकात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या जारकीहोळी यांनी अशुभ समजल्या जाणाऱ्या राहू काळात आपला उमेदवारी अर्ज भरला, स्मशानात प्रचार केला आणि त्यानंतर निवडूनही आले. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट् न्यूज लाइव्ह