Mumbai Maharashtra News : लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याचं लक्ष आता विधानसभेकडे लागलं आहे. लोकसभेत झालेल्या चुका टाळण्याकरता आता महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. सध्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार, कोणत्या जागा मिळणार यावर खल सुरू आहे. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री पुन्हा दिल्लीत गेल्याची चर्चा आहे. दिल्लीवरून त्यांनी पुन्हा आज पहाटे पुन्हा नागपूर गाठलं असल्याचंही वृत्त आहे. त्यांच्या अचनाक दिल्लीवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय, आजपासून संसदेतील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधीसह इतर अनेक कार्यक्रम आज होतील. तर दुसरीकडे राज्यात सर्वत्र पावसाचं वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मुंबई-ठाण्यात उन-पावसाचा खेळ सुरू असून त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.