Maharashtra News Updates : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (३ मार्च) सुरू होत आहे. आज विधीमंडळात राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर अधिवेशनाला सुरुवात होईल. दरम्यान, हे अधिवेशन वादळी ठरेल असं दिसतंय. कारण राज्यात मोठी उलथापालथ चालू आहे. राज्यात महिला सुरक्षेचा व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांचं प्रमाम वाढलंय. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांवर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. एका मंत्र्याला (माणिकराव कोकाटे) न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तर, दुसरा मंत्री (धनंजय मुंडे) बीडमधील हत्या प्रकरणामुळे विरोधकांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. या सर्व घटनांमुळे विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात. तसेच पुण्यातील बलात्काराचं प्रकरण, जळगावात केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडछाडीचं प्रकरण ताजं असल्यामुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होऊ शकतात. अधिवेशनातील या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. तसेच राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra Live News Update Today, 3 March 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
प्रशांत कोरटकर अखेर शिवरायांसमोर नतमस्तक; म्हणतोय, “मी पोलिसांना…”
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली.
“सरकारने स्वतःच…”, खासदार शाहू महाराज पहिल्यांदाच प्रशांत कोरटकरच्या वक्तव्याबद्दल बोलले
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कारवाई व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. दरम्यान, या प्रकरणावर आतापर्यंत छत्रपती घराण्यातील कोणत्याही सदस्याने प्रतिक्रिया दिली नव्हती. अशातच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होतं. आमच्या ऐकण्यात आले आहे की, ते दुसऱ्या राज्यात गेले आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना जामीन मिळाला असला तरी ११ मार्चपर्यंत वेळ दिला आहे, ६ मार्चला मुख्यमंत्री येणार आहेत. त्यांच्याशी यावर बोलू. याप्रकरणी निषेध नोंदवून सर्वजण कंटाळले असतील, पण असे वक्तव्य करणे योग्य नाही. सगळ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. कारण, कोणालाही ते वक्तव्य आवडलेलं नाही. त्यांनी काय म्हटलं आहे ते प्रसारमाध्यमांत आलं आहे.राज्य सरकार म्हणतंय की त्यांच्यावर कारवाई करणार. पण ते लवकर कारवाई करत नाही. सरकारने स्वतः कोरटकर यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे. या कारवाईसाठी जे कायदे आहेत ते पुरेसे आहेत, त्या कायद्यांतर्गत कारवाई करता येते, नवीन कायद्याची गरज नाही.
मुंबईतील किमान तापमानात घट होण्याची शक्यता
मुंबई व परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्मा जाणवत आहे. दिवसा आणि रात्रीचे तापमानही जास्त होते. यामुळे पहाटेचा गारवा नाहीसा झाला होता.
मुंबई : मोबाइवरून ३० वर्षाच्या तरूणाची हत्या
अशोक अविनाश तुळसे (३०) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो साकीनाका येथील अशोक नगर परिसरातील रहिवासी आहे.
जितेंद्र आव्हाड हातात बेड्या अडकवून विधान भवनात आले, नेमकं कारण काय?
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय, व्यक्त होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जातायत, ती पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे. प्रत्येकाला व्यक्त होता आलंच पाहिजे. बोलणे, व्यक्त होणे हे आमचे मूलभूत अधिकार आहेत. आम्हाला व्यक्त होता येत नाहीये म्हणून मी या बेड्या अडकवून आलो आहे”.
विम्याचा हप्ता भरताना काळजी घ्या, तब्बल ५१ लाखांची फसवणूक
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांची नामांकित विमा कंपन्यांच्या नावावर फसवणूक करण्यापर्यंत मजल गेली आहे.
नागपूर : बसस्थानकावर गर्दीत महिलांशी लगट, विकृताचे गैरकृत्य…
मंगेश हा महिलांची गर्दी असलेल्या ठिकाणी जातो. त्यांच्या मागे उभा राहतो. गर्दीत तो रेटारेटी करतो.
“विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क”, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेने ठोकला शड्डू
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. यातच आज ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क आहे, असं विधान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलंय. ते आज माध्यमांशी बोलत होते.
रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱे कोण? राऊत माहिती देत म्हणाले…
जळगावात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीशी काही टवाळखोर तरुणांनी छेडछाड केल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. राउत म्हणाले, “वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुंडे यांच्यासारख्या प्रवृत्तीच्या सामाजिक कार्यकर्त्याने छेडछाड केली. तो विनयभंग करणारा कार्यकर्ता कोण होता? तो कुठल्या पक्षाचा होता? कुठल्या नेत्याच्या जवळचा होता ते आम्ही ‘सामना’च्या (शिवसेना उबाठा गटाचं मुखपत्र) पहिल्या पानावर छापलं आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्याचे फोटो आहेत. तो कार्यकर्ता त्यांच्याच पक्षाचा होता. अशी प्रवृत्तीचे हे लोक स्वतःला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे वारसदार म्हणवून घेतात. यांचा नेता जसा आहे, कार्यकर्ते देखील तसेच आहेत.
कांदळवनात थरारनाट्य! घरफोडी, चोरीतील एकाला अटक, दोघांचा शोध सुरू; ड्रोनची मदत
पनवेल परिसरात घरफोडी व अन्य काही गुन्ह्यातील तीन संशयित वाशीत असल्याची माहिती गुन्हे शाखा परिमंडळ दोनच्या युनिटला मिळाली.