Mumbai- Maharashtra News Updates in Marathi : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. रविवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूनंतर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. उद्योग क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे असा गंभीर आरोप शिवसेनेने ‘सामना’च्या संपादकीयमधून केला आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजपा आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? अशी टीकाही शिवसेनेने केली आहे. “पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच!”, असा इशारा 'सामना'तून देण्यात आला आहे.