Maharashtra Breaking News LIVE Updates : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मस्साजोगवासियांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनावणे हे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राज्यात मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीवरून रणसंग्राम सुरू आहे. राज्यातील विविध खात्यातील दलाली रोखता यावी याकरता मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्यानंतर आता त्यांच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांना आरोपीची ओळख पटली असून त्याच्या शोधासाठी आठ पथक तैनात करण्यात आले आहे. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५,, रा. शिक्रापूर) असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर जबरी चोरीचे गुन्हेही दाखल आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra News Highlights ,26 February 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी, या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशा विविध मागण्यांसाठी मस्साजोगवासियांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून सरकारने त्यांची एक मागणी मान्य केली आहे. सरकारने उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तर, बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. pic.twitter.com/CkHIgGNneF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2025
क्षमता २० कोटी, दाखविले १३३ कोटी! ‘न्यू इंडिया’प्रकरणी ऑडिट कंपन्यांना समन्स
‘न्यू इंडिया को ऑप बँक’ गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सहा ऑडिट कंपन्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. बँकेच्या दोन शाखांमधील तिजोरीची क्षमता केवळ २० कोटी रुपयांची रक्कम ठेवण्याची असताना त्यात १३३ कोटींपेक्षा जास्त रक्कम ठेवल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे याप्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे आहेत.
मुंबईतील चार हजार अपंगांचे अर्ज सादर; आनंद दिघे योजनेअंतर्गत २७०० जणांना अर्थसाहाय्य
मुंबईतील अठरा वर्षांवरील अपंग व्यक्तींसाठी महापालिकेच्या वतीने सुरू केलेल्या आनंद दिघे दिव्यांग अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आतापर्यंत २७०० अपंगांना अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. सविस्तर वाचा…
म्हाडाचा पहिला ‘झोपु’ प्रकल्प मार्गी; जोगेश्वरीतील १५५० चौ. मीटर भूखंडावरील प्रकल्पासाठी ‘झोपु’ प्राधिकरणाकडून इरादा पत्र
मुंबईतील रखडलेल्या १७ झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने कामाला वेग दिला आहे. त्यानुसार आता लवकरच म्हाडाचा मुंबईतील पहिला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागणार आहे. सविस्तर वाचा…
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, तळोजा औदयोगिक परिसरात शुक्रवारी पाणी नाही
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे कल्याण तालुक्यातील जांभुळ येथील जलशुध्दीकरण केंद्र, बारवी गुरुत्व वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हाती घेतले जाणार आहे.
पालिका आणि पोलिसांचे हितसंबंध; कारवाई केलेले डान्सबार पुन्हा सुरू
मिरा भाईंदर महापालिकेने कारवाई केलेल्या २२ डान्स बार पैकी बहुतांश डान्स बार पुन्हा सुरू असल्याची बाब समोर आली आहे. हे डान्स बार वेळेची मर्यादा ओलांडून पहाटेपर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. सविस्तर वाचा…
प्रेयसीच्या पतीला संपविताना प्रियकराचाही बुडून मृत्यू
अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढला. परंतु त्याच वेळी हे कृत्य प्रियकराच्याही जिवावर बेतले. दोघांचाही जीव गेला. बार्शी तालुक्यातील पांगरीजवळ हा प्रकार घडला. सविस्तर वाचा…
“बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांना भारतरत्न देण्याकरता राज्य सरकारने ठराव करावा”, संजय राऊतांची मागणी
वीर सावरकरांचा आज स्मृतीदिन आहे. वीर सावरकर महान योद्धे, लेखक आणि कवी होते. स्वातंत्र्यवीर होते. त्याविषयी कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी इतिहास वाचावा. वीर सावरकर यांच्या गीताबद्दल जो पुरस्कार दिला जातोय, तो स्वागतार्ह निर्णय आहे. महाराष्ट्र सरकारने एक ठराव केंद्राला पाठवायला हवा. दोन हिंदूहृदयसम्राट या देशात झाले. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदूहृदयसम्राटांनी देशाला दिशा दिली. त्यामुळे या दोन नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणास्त्रोत मानतात, कधी बाळासाहेबांना मानतात. ते सोयीनुसार करतात. माझी अशी भूमिका आहे की वीर सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना एकाचवेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही, कारण हे दोघेही देशाचे प्रेरणास्थान राहिले आहेत. महाराष्ट्राने ठराव तरी पाठवावा, मग बघू केंद्र काय करतंय ते. मतांची गणितं जुळावीत म्हणून माहित नसलेल्या अनेक लोकांना या सरकारने भारतरत्न पुरस्काराची खिरापत वाटली. मला नावं घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही. जातिय आणि राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारतरत्न पुरस्काराचं अवमुल्यन झालं – संजय राऊत</p>
Maharashtra News Highlights , 26 February 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर