Maharashtra Breaking News Updates, 30 July 2024 : विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. असे असतानाच सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती बरोबर जाण्याच्या अगोदर दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजे वेश बदलून दिल्लीला जात असायचे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. यावरून विरोधकांकडून आता टिकेची झोड उठली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही टीका केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी पुण्यातील मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला आता अजित पवार गटाकडून प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Today, 30 July 2024
पुणे : विद्युत तारेची दुरुस्ती करताना विजेचा झटका बसल्याने महावितरणमधील तंत्रज्ञाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पर्वती भागातील लक्ष्मीनगर परिसरात घडली. तरुण कर्मचाऱ्याच्या अपघाती निधनामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच राज ठाकरे यांना सुपारीबाज असा उल्लेख अमोल मिटकरी यांनी केला होता. यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अकोल्यात अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. यानंतर आता अमोल मिटकरी हे आक्रमक झाले असून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच अटक करण्याच्या मागणीसाठी अमोल मिटकरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन सुरु केलं आहे.
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बसस्थानकासमोरील भगवती कलेक्शन समोर जिवंत बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बॉम्ब असल्याची माहिती गडचांदूर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
मुंबई : यंदा गौरी-गणपतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्नस वितरीत करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला आहे. मात्र, त्यासाठी १८ जुलै रोजी काढलेल्या निविदा प्रक्रियेतील ३०० जणांच्या मनुष्यबळाच्या आणि या कामासाठी मागील तीन वर्षांत २५ कोटी रुपये खर्च करण्याच्या अटीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून न्यायालयानेही या अटीबाबत सोमवारी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, त्यावर, भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
“राज्य सरकारने एक शासन आदेश जारी केलेला आहे. सर्व योजनांसाठी राज्य सरकार पुढच्या दोन महिन्यांत २७० कोटी खर्च करणार आहे. मात्र, ही शासकीय योजनांची प्रसिद्धी मोहीम आहे असं दिसत नाही तर नाही तर ही निवडणुकीची प्रसिद्धी मोहीम आहे, असं दिसतं आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली.
पुणे : मावळ विधानसभेमध्ये महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभेवर दावा केल्यानंतर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिला वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून १ कोटींहून अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. दुसर्या बाजूला विरोधकांनी या योजनेवरुन टीका करण्यास सुरुवात केली. तर ही योजना राज्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे.त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात येत आहे.
एका मालगाडीचे २० डब्बे रुळावरुन घरसले आणि शेजारच्या रेल्वे मार्गावर पडले.
वसई – अर्नाळा येथील सेव्हन सी रिसॉर्टमध्ये ठाणे शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद मोरे यांच्या मृत्यूप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाऐवजी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
येथील ७६ टक्के भाग हा जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थित लोक आश्रय घेतात.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच राज ठाकरे यांना सुपारीबाज असा उल्लेख अमोल मिटकरी यांनी केला होता. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची अकोल्यात तोडफोड केली आहे. यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या गाडीमध्ये कोणीही नव्हतं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर आता उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून आरक्षणावर चर्चा करावी, तेव्हा जो निर्णय होईल, त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे एका पट्टेदार वाघाचे पायाचे ठसे दिसल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली.
Maharashtra Police Vacant Posts: पोलीस महासंचालकांनी २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्रता मिळवलेल्या ६६० पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला होता.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या या इशाऱ्यामुळे महायुतीत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
अनेक पालक बराच वेळ मुलांसह वाहतूक कोंडीत अडकलेले दिसतात. मात्र एकही वाहतूक पोलीस या रस्त्यावर दिसत नाही.
लालबाग परिसरातील एस. एस. राव मार्गावरील क्षीरसागर हॉटेलनजीकच्या तीन मजली इमारतीत मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.
सविस्तर वाचा…
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन सुरु केला आहे. या आंदोलनाबाबत मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. “मातोश्रीवर गेलेले कोण? मला माहिती नाही. मराठा समाजाचं राज्यात सध्या आंदोलन सुरु नाही. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्याचा हक्क आहे. पण दरेकरांच्या अभियनात सहभागी होऊन असेल तर ते आम्हाला मान्य नाही. सध्या मराठा समाजाचं आंदोलन राज्यात सुरु नाही. याचा अर्थ असा होता की मराठा समाजाच्या आंदोलनात देवेंद्र फडणवीसांना फूट पाडायची आहे का?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे पावणे दोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प महाराष्ट्रासाठी कायम धोकादायक ठरला आहे.
उत्तरप्रदेशातून पळवून आणलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्या केल्याची घटना काशिमिरा येथे घडली आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी दोन तरुणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीला पहिल्या पतीपासून साडेचार वर्षीय मुलगा त्या मुलाला घरी राहण्यासाठी आणल्याने मोहम्मद दिलशाद मोहम्मद इम्रान (२३) याने त्याला मारहाण केली. तसेच लोखंडी खाटेवर ढकलले. या घटनेत त्याच्या मणक्याचे अस्थिभंग झाल्याने तसेच अंतर्गत जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा…
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.
वाहतूक पोलीस मात्र हातावर हात ठेवून हा सर्व प्रकार बघत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील एका उद्योजक महिला आणि इतर गुंतवणूकदारांची उल्हासनगर मधील पती, पत्नीने व्यवसायातील गुंतवणुकीच्या माध्यमातून ३१ लाख ५८ हजार ४८० रूपयांची फसवणूक केली आहे. मागील दोन वर्षाच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे, सविस्तर वाचा…
Central Railway Trains Running Late गेल्याकाही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर विविध तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होत असून अनेक रेल्वेगाड्यांची वाहतुक सुमारे २० ते २५ मिनीटे उशीराने धावत आहे. सविस्तर वाचा…
देशातून पलायन केलेल्या आणि न्यायालयाने समन्स बजावूनही आदेशांचा वारंवार अवमान करणाऱ्या फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या याचिका का ऐकायच्या? त्यावर सुनावणी का घ्यावी? असा संताप उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेश बदलून दिल्लीला गेल्याच्या चर्चांवर बोलताना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. वेश बदलून अजित पवार यांनी दिल्ली विमान प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेश बदलून दिल्लीला जात असल्याच्या चर्चांवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. तसेच दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? यामध्ये दिल्ली आणि मुंबई विमानतळाची आणि संबधित एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे, तसेच याचं उत्तर केंद्र सरकारने दिलं पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
हत्तीच्या आगमनाच्या वार्तेने नवेगावबांध व परिसरात एकच खळबळ माजली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आसाममधून आलेल्या हत्तीच्या कळपाने गडचिरोली परिसरात ठाण मांडले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेश बदलून दिल्लीला जात असल्याच्या चर्चांवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. तसेच दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.