Mumbai Pune Latest News Live Update: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यातच राहुल गांधींच्या खासदारकी प्रकरणावरूनही राज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मविआच्या संयुक्त सभेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.