Marathi News Updates : संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं आहे. या वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या विधेयकावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. तसेच दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. यासह राजकीय वर्तुळातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Mumbai-Maharashtra News Live Today, 4 April 2025 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर…

17:00 (IST) 4 Apr 2025
नागपुरातील प्रसिद्ध श्रीराम शोभायात्रेचे चार ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून स्वागत… आयोजन समिती म्हणते…
पोद्दारेश्वर राम मंदिरचे प्रबंधक विश्वस्त पुनीत पोद्दार पत्रपरिषदेत म्हणाले, श्रीराम जन्मोत्सव शोभायात्राचे यंदा ५८ वे वर्ष आहे. पोद्यादारेश्वर मंदिरापासून काही अंतरावर मोमीनपुरा ही मुस्लिमांची वस्ती आहे. रामनवमनीनिमित्त निघणारी शोभायात्रेत प्रत्येक वर्षी मुस्लीम समुदायातील अनेक लोक सभागी होतात. …Read Full Details
16:51 (IST) 4 Apr 2025

अंजली दमानिया-मनोज जरांगे यांची भेट, संतोष देशमुख हत्याकांडाबाबत चर्चा

छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याचा जबाब अर्धवट असून, अनेक प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळत नाही. पुढील काळात या प्रकरणात कोणती व्यूहरचना करता येईल, यावर गुरुवारी अंजली दमानिया आणि मराठा आरक्षण आंदोलन मागणीचे आंदोलनकर्ते मनाेज जरांगे यांची भेट झाली.

16:50 (IST) 4 Apr 2025

अवकाळी पाऊस, भोकरदनमध्ये वीज पडून जनावरांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असून, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला. फुलंब्री व जालना तालुक्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही वेळ गारांचा पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील बहुतांश भागात सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण आहे. पावसाची तीव्रता अधिक नसली, तरी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात काही तालुक्यांत मोसंबीचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

16:49 (IST) 4 Apr 2025

खोट्याचा बोलबाला झाला तरी शेवटी विजय सत्याचाच, पंकजा मुंडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

जालना : विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि परीक्षेत काॅपीच्या मार्गाला जाऊ नये. आगाऊ मित्र सर्वांच्याच वाट्याला येतात. असा एखादा मित्र म्हणाला की, माझ्याकडे गाईडची पाने फाडून आणलेली आहेत तर त्याचे ऐकू नका. कारण जगात खोट्याचा बाेलबाला कमी वेळ जोरजोराने होत असला तर शेवटी सत्याचाच विजय होत असतो, असे पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

16:49 (IST) 4 Apr 2025

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

छत्रपती संभाजीनगर : चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात दाखल सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपी मेराज खान रफिक खान (४६, रा. समतानगर) याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांनी बुधवारी सुनावली.

16:48 (IST) 4 Apr 2025

धर्माबाद मार्गावरील अपघातात दोन ठार; दोन गंभीर

नांदेड : उमरी ते धर्माबाद राज्य रस्त्यावरील राजापूर चौरस्त्यावर बुधवारी सायंकाळी पिकअप व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शेख अयाज शेख सलीम (वय २५, रा. धर्माबाद) व कपिल बाबूराव गायकवाड (वय २४, रा. करखेली) अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत. तर गंभीर जखमी मुकुंद रामा क्षीरसागर व राजू लक्ष्मण कांबळे यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.

16:48 (IST) 4 Apr 2025

बीडजवळ नवदाम्पत्याची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : बीड शहरापासून जवळ असलेल्या केतुरा गावात अवघ्या ४० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने एका पाठोपाठ आत्महत्या केली. नवविवाहितेने बुधवारी रात्री व तरुणाने गुरुवारी पहाटे गळफास घेऊन जीवन संपवले. पुण्याला राहायला घेऊन जाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

16:32 (IST) 4 Apr 2025
ठाण्यातील मोक्याच्या जागेवरील जुन्या इमारती विशिष्ट बिल्डरांच्या घशात, भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या आरोपामुळे खळबळ
ठाणे महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिटरची यादी करून ठाण्यातील रहिवाशांना यादीतील ऑडिटरकडून इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आवाहन केले होते. …Learn More
16:29 (IST) 4 Apr 2025

नांदेडमध्ये ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत पडल्याच्या घटनेत ८ महिलांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

नांदेडच्या आलेगाव शिवारात शुक्रवारी घडलेल्या भीषण अपघातामध्ये ८ महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. या संदर्भातील ट्विट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, “नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी ११ महिला मजूर घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळून अपघात झाल्याची घटना अत्यंत दुःखदायक आणि दुर्देवी आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलांना श्रद्धांजली अर्पण करतो. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील महिला शेती कामासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून विहिरीतून ३ महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच काही महिलांचा या दुर्देवी घटनेत मृत्यू झाला असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून ईश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

https://platform.twitter.com/widgets.js
16:08 (IST) 4 Apr 2025
समृद्धीवर पुन्हा अपघात!… एकाचा मृत्यू, एक गंभीर
हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दृतगती महामार्गावर शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी सकाळी झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. …Read More
15:50 (IST) 4 Apr 2025
मध्य रेल्वे मार्गावर स्वयंचलित ‘सिग्नलिंग’… आता दोन गाड्यांमधील अंतर…
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत भुसावळ-बडनेरा खंडातील बडनेरा – टाकळी – कुरुम दरम्यान स्वयंचलित ‘ब्लॉक सिग्नलिंग’ प्रणाली ३ एप्रिलपासून कार्यान्वित करण्यात आली. …Read More
15:37 (IST) 4 Apr 2025
छातीत तलवार खुपसून तरूणाची हत्या करणाऱ्या आरोपीला अखेर जन्मठेप…
ब्रिजेशने तिच तलवार घेऊन ऋषिकेशचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याने ऋषिकेशला गाठले आणि तलवारीने त्याच्या छातीत वार करून त्याची हत्या केली. हत्या व प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. …Read Full Details
15:23 (IST) 4 Apr 2025

नादुरुस्त वाहनाला धडक दोघांचा मृत्यू

लातूर- औसा- तुळजापूर रस्त्यावर औसा तालुक्यातील बेलकुंड येथे गुरुवारी रात्री नादुरुस्त ट्रकला मागून आयशर टेम्पो धडकला तर आयशर टेम्पोला मागून येणाऱ्या कारची धडक बसली या अपघातात आयशर टेम्पो चालक व नादुरुस्त ट्रक दुरुस्ती करणार्या मेकॅनिकच्या जागीच मृत्यू झाला .

गुरुवारी दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे .ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता त्या दुरुस्तीचे काम मेकॅनिक करत होता .औशावरून पुण्याकडे कोथिंबीर घेऊन निघालेला आयशर टेम्पोच्या चालकाला पावसामुळे उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न लागल्याने तो ट्रकला मागून धडकला या अपघातात आयशर टेम्पोचालक दत्ता सावंत वय ४५ राहणार आशीव ता. औसा याचा जागीच मृत्यू झाला ट्रकची दुरुस्ती करणार्या मेकॅनिकच्या डोक्यावर ट्रकचे चाक गेल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला.दरम्यान या दोन वाहनाला मागून येणाऱ्या कारने धडक दिली, सुदैवाने कारमधील लोक बचावले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

15:22 (IST) 4 Apr 2025

नियंत्रण सुटल्याने खाजगी बसचा अपघात

बोईसर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील बस रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाल्याची घटना बोईसर तारापूर रस्त्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बसचे चालक आणि वाहक यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

बोईसर तारापूर रस्त्यावरील परनाळी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास खाजगी कंपनीच्या बसचा अपघात झाला. तारापूर बाजूकडून बोईसर कडे भरधाव वेगाने येणाऱ्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस मुख्य रस्ता सोडून खाली उतरली. या अपघातात बसचे चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी वेळीच धाव घेऊन बसमधील चालक व वाहकाला बाहेर काढले.

15:01 (IST) 4 Apr 2025
सावधान! सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास पाच हजारांपर्यंत दंड…
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता दंडात्मक कारवाई सुरू केली असून, उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांवर जागीच कारवाई करण्यात येत आहे. …Read More
14:57 (IST) 4 Apr 2025
घोडबंदर येथील कचरा हस्तांतरण केंद्रास नागरिकांचा विरोध; महापालिकेच्या पथकाला नागरिकांकडून रोखण्याचा प्रयत्न
नागरिकांनी प्रचंड विरोध केल्यानंतर तसेच शिंदे गटाने महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या फोडण्याचा इशारा दिल्यानंतर ठाणे महापालिकेने येथून कचरा हस्तांतरण बंद केले. …Read More
14:39 (IST) 4 Apr 2025
पीक कर्ज फेडण्यासाठी चक्क किडनी विक्रीला, कर्जमाफीला शासनाच्या नकाराविरुद्ध आंदोलन
पीक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने चक्क स्वत:सह कुटुंबातील सदस्यांच्या किडनी व इतर अवयव विक्रीला काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. …Read More
14:36 (IST) 4 Apr 2025
शिंदेना रोखण्यासाठी भाजपचे डावपेच ?
राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक असलेल्या कळव्यातील नगरसेवकांना पक्षात ओढण्याची रणनिती भाजपकडून आखली जात असून महापालिका निवडणुकीत युती झाली नाही तरी शिंदे यांना या माध्यमातून आव्हान उभे करता येईल …Learn More
14:35 (IST) 4 Apr 2025
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी वाहने उभी करण्यावरून हाणामाऱ्या
याप्रकरणी मारहाण झालेल्या दोन दुचाकी वाहन चालकांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी एकूण सहा जणांच्या विरुध्द मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. …Read Full Details
14:30 (IST) 4 Apr 2025
शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ विदर्भात काही चालेना !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘ ऑपरेशन टायगर’ ला विदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. …Read Full Details
13:54 (IST) 4 Apr 2025
“शरद पवारांकडून माहिती घेतली असती तर…”, प्रफुल्ल पटेल यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि हे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात राज्यसभेत वक्फ विधेयकाबाबत बोलताना शाब्दिक खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांच्यावर पुन्हा जोरदार टीका केली आणि आपल्या नादी न लागण्याचा इशारा दिला. यानंतर आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण शरद पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं’, अशी खोचक टीका प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत केली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
13:44 (IST) 4 Apr 2025

‘मन सुन्न करणारी घटना, कायदेशीर कारवाई..’; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

तनिषा भिसे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण पैशा अभावी वेळेत उपचार न देण्यात आले नाही आणि त्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ही घटना मन सुन्न करणारी असून चौकशी अहवाल समोर आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सविस्तर वाचा

12:47 (IST) 4 Apr 2025
दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात त्या दिवशी काय झालं? रक्तस्राव होत असतानाही उपचार दिले नाहीत, नातेवाईकांचा आरोप
Tanisha Bhise death case: पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचार देण्यासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यादिवशी रुग्णालयात नेमके काय झाले? याचा घटनाक्रम समोर आला आहे. …Read More
12:25 (IST) 4 Apr 2025

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, योग्य ती कारवाई…”

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता नागरिक आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात नागरिकांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली आहे. यावर आता पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की, “मला या प्रकरणार बोलण्याच्याआधी या घटनेचा अहवाल माझ्याकडे येणं गरजेचं आहे. आमच्याकडे सिव्हील सर्जन यांचा अहवाल आला की त्यामाध्यमातून समोर येईल की नेमकं काय-काय झालं होतं? यावर संबंधित रुग्णालयाची प्रतिक्रिया देखील समोर येईल. त्यानंतर आपल्याला या घटनेत कोणाची चूक होती? या संदर्भातील निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि कारवाई केली जाईल”, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिली.

12:22 (IST) 4 Apr 2025
कल्याणमध्ये बेकायदा बांधकामांवरून शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाकडून पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण
बेकायदा बांधकामे करुनही भूमाफिया मुजोरी करत असतील तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, या विचारातून प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला. …Read More
12:15 (IST) 4 Apr 2025
कृषी विभागाचा कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत मोठा निर्णय
राज्य सरकारच्या पातळीवर प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. कृषी क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर दिला जात आहे …Read More
11:33 (IST) 4 Apr 2025
उल्हासनगरातील श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू; ४ हजारांहून अधिक श्वानांच्या निर्बिजीकरणाचे आव्हान
उल्हासनगर शहरात गेल्या काही महिन्यात भटक्या श्वानांची संख्या वाढल्याचे दिसून आले होते. भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकारही वाढले होते. …Read Full Details
11:29 (IST) 4 Apr 2025
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता नागरिक आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात नागरिकांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली आहे.

11:02 (IST) 4 Apr 2025

‘देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला’, मुख्यमंत्री फडणवीसाची मनोजकुमार यांना श्रद्धांजली

‘ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

10:46 (IST) 4 Apr 2025

“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार पोपटपंची करत फिरतायेत”, संजय राऊतांची टीका

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. या घटनेवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटलं की, “भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीच्या उपचारासाठी फडणवीसांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेल्याचं सांगितलं जातं. तरीही त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. एका मातेचा अंत झाला. मग देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झालेत. सरकार काय करतंय? मला असं वाटतं की गोरगरिबांचे कामं त्यांच्या पातळीची नाहीत. देवेंद्र फडणवीस यांची झेप खूप मोठी आहे. अडानी, अंबानी, टाटा यांची कामे होतात. गोरगरिंबाची कामे होत नाहीत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार फक्त पोपटपंची करत फिरत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)