Marathi Breaking News LIVE Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तासभर भेट झाल्यानंतर त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये धार्मिक प्रार्थनास्थळ हटवल्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यासंदर्भात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अमरावती-मुंबई विमान सेवेला आजपासून सुरुवात होत असून उद्घाटनासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
Mumbai-Maharashtra News Live Today, 16 April 2025 : नाशिकसह महाराष्ट्रभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
मुघल साम्राज्य, निजाम काळात जमीनदारी…पारवा येथे इतिहासाची साक्ष देत उभा आहे ‘वाडा चिरेबंदी’…
पालघर नगरपरिषद क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; जीवितहानी टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कार्यवाही
कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा…महायुतीकडून आश्वासनांची अपूर्णता…नाशिकच्या निर्धार शिबिरात आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांवर बरसले
सिमेट, डांबरीकरणामुळे कोंडलेला झाडांचा श्वास मोकळा करा
कुटुंबाकडून शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचे सर्वेक्षण
डोंबिवलीतील नांदिवलीत विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बेकायदा इमारतीची उभारणी
गोदावरीच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी एक हजार कोटीचा प्रस्ताव
मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ATM, आता धावत्या ट्रेनमध्ये पैसे काढण्याची सुविधा; देशातला पहिलाच प्रयोग!
आदित्य ठाकरे यांच्या स्वागताला उदंड गर्दी अन मंचाचा खाडकन आवाज…नाशिकमधील निर्धार शिबिरातील प्रकार
अहिल्यानगरमध्ये प्रवाशांवर रणरणत्या उन्हात थांबण्याची वेळ, मनपाच्या ‘ना हरकत’ अभावी बसस्थानकाचे काम रखडले
‘एचएसआरपी’ला अमरावतीकरांचा अल्प प्रतिसाद, आतापर्यंत केवळ ५ हजार ४८२ वाहनांवर..
‘जलजीवन मिशन’मधील ठेकेदारांचे रोहित पवार, नीलेश लंकेशी लागेबांधे; सुजय विखे यांचा हल्लाबोल
नवी मुंबई: पालिकेच्या ५० हजारांहून अधिक मुदतबाह्य नस्ती नष्ट
सोलापूरचा पारा ४३ अंशांच्या दिशेने
सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून सोलापुरात चाळिशी पार केलेल्या तापमानाचा पारा आता ४३ अंशांच्या दिशेने जात आहे. मंगळवारी येथील तापमान ४२.२ अंशांवरून ४२.८ अंशांवर पोहोचले होते. हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यात उच्चांकी मानले गेले.
गेल्या फेब्रुवारीपासून सोलापुरात उन्हाळा चांगलाच जाणवत आहे. मार्चनंतर एप्रिल उजाडताच तापमानात आणखी असह्य वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी रात्री वारे चांगले खेळत होते. परंतु आता कोरड्या हवामानात उष्मा जाणवत आहे. घरात रात्री उष्म्याने झोपलेली मुले जागी होत आहेत. त्यांची झोप उडाल्याचे चित्र दिसून येते. मुलांसह वृद्ध मंडळींचे आजारपण वाढले आहे.
सध्या सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. रस्त्यावर उष्णतेच्या झळांमुळे नागरिक उन्हात घराबाहेर पडणे टाळत आहेत. आवश्यक कामांसाठी घराबाहेर पडताना डोक्यावर सावली देणारी टोपी, गमछा आणि डोळ्यांवर थंडावा देणारा काळा गॉगल परिधान करणे पसंत केले जात आहे. उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी उसाचा रस, लस्सी, ताक, मठ्ठा, लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांचा आस्वाद घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. आईस पार्लरसह रसपानगृहे, ज्यूसबार गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळते.
डोंबिवलीत भोपर गावात शेतकऱ्याला धमकाविण्यासाठी बंदुकीतून हवेत गोळीबार
सोलापूर : भूखंडासाठी विवाहितेचा छळ करून तिहेरी तलाक, पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा
नागपूरच्या तरुणाने कॅलिफोर्नियात उडवले १३ किलोचे विमान
परप्रांतीयांनाही परभणीतून जन्मदाखले, दाखला मिळवण्यासाठी खोटी माहिती ; १७ जणांविरुद्ध गुन्हा
सरणावरही मरणयातना; उरण नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमींत अंधार
डोंगरी महोत्सवास पाटणमध्ये प्रारंभ, शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; पहिल्याच दिवशी प्रतिसाद
Monsoon 2025 : हवामानतज्ज्ञ म्हणतात, “तोपर्यंत शेतकऱ्यांनी नियोजन…”
मी लुटारूंकडे लक्ष देत नाही; आमदार कथोरेंची वामन म्हात्रेंवर बोचरी टीका
अविनाश आदिकांनी घेतली अजित पवारांची भेट, श्रीरामपूरमधील घडामोडींकडे राजकीय चर्चा
Aaditya Thackeray on Eknath Shinde: एसंशि अमरावतीहून थेट गावी जाणार आहेत – आदित्य ठाकरे
देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते.. आमचं सरकार येणार, सरकार आल्यानंतर वगैरे… काय काय सांगत होते ते. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार म्हणाले होते. सातबारा कोरा करणार म्हणाले होते. वीजमाफी सांगितली होती. फडणवीसांचं सरकार बसलं, त्यांचे १३६ आमदार निवडून आलेत. हे फडणवीसांचंच सरकार आहे. एसंशि तिथे चिकटण्यासाठी चिकटले आहेत. कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील. आता अमरावतीहून थेट गावी जाणार आहेत. कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय. आता पुढचं मी काही बोलत नाही – आदित्य ठाकरे</p>
Aaditya Thackeray on Mahayuti Govt: भाजपाच्याच कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत – आदित्य ठाकरे
या राज्यात भाजपाच्याच कार्यकर्त्यांची हत्या होत असेल तर आपण सगळ्यांनी करायचं काय? महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? – आदित्य ठाकरे</p>
Aaditya Thackeray on Mahayuti Govt: १०० दिवसांत एकही चांगली योजना नाही – आदित्य ठाकरे
या सरकारला १०० दिवस उलटून गेले आहेत. पहिले १०० दिवस हनिमून पिरियड मानला जातो. या काळात मुख्यमंत्री जे काही करतात, त्याचं कौतुक साधारणपणे केलं जातं. पहिल्या १०० दिवसांत एकही चांगली योजना कुणासाठी आणलेली नाही – आदित्य ठाकरे</p>
Aaditya Thackeray on Sanjay Raut – संजय राऊत पटकन काहीतरी बोलून जातात – आदित्य ठाकरे
मी राऊत साहेबांना फोन केला. त्यांना विचारलं की संजय काका उद्या काय बोलायचंय, मला विषय काय दिलाय? तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे यावर बोल – आदित्य ठाकरे</p>
सांगलीत गुन्हेगारांचा धारदार शस्त्राने खून, दोघांना अटक
अमरावतीमधील नवीन विमानतळ (फोटो – MADC X Handle)
Mumbai-Maharashtra News Live Today, 16 April 2025 : महाराष्ट्राची बित्तंबातमी…