Maharashtra Breaking News Live Updates, 17 October 2024 : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर राज्यभर निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पक्षांचे मेळावे, जाहीर सभा, प्रचारफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. तसेच महायुती, महाविकास आघाडी व नव्यानेच होऊ घातलेल्या तिसऱ्या आघाडीत जागावाटपावर चर्चा चालू आहे. याबाबतच्या बातम्यांचा बातम्यांचा आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वेध घेणार आहोत. तसेच इतर राजकीय व सामाजिक बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
Maharashtra Breaking News Live Today, 17 October 2024 : महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
अकोला : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबता-थांबत नसल्याचे चित्र आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला.
ठाणे : शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून शहरातील मुख्य उड्डाणपूल, चौक, महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रंगरंगोटी केलेल्या संरक्षण भिंती या सर्वांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असलेले फलक (कागदी स्टीकर) झळकू लागले आहे.
सपा नेते व आमदार अबू आझमी म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (पवार) आणि शिवसेना (ठाकरे) नेतेच सहभागी होतायत. छोट्या पक्षांच्या बैठका बाकी आहेत. मी समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांना आठवण करून दिली आहे की आपल्याला खूप उशीर होतो. सर्वजण उमेदवारांच्या याद्या फायनल करत आहेत. काँग्रेस लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं माझ्या कानावर आलं. माझा कोणावर राग नाही, राहुल गांधी आणि अखिलेश यादव सध्या काश्मीरमध्ये आहेत त्यामुळे तिथे त्यांनी चर्चा करावी यासाठी मी पोस्ट केली. आम्ही १२ जागा मागितल्या आहेत. भिवंडीतकाँग्रेस जिंकू शकत नाही. मात्र, मी तिथे निवडूक जिंकू शकतो.
नागपूर : नैऋत्य मोसमी पाऊस राज्यातून जवळजवळ परतला असताना अवकाळी पावसाचे संकट राज्यावर घोंगावत आहे.
गुन्हा नसताना १९ दिवस कारागृहात डांबले, ४३ वर्षे जुनी फाईल बंद करण्याच्या नादात पोलिसांनी...
नागपूर : ४३ वर्ष जुने प्रकरण बंद करण्याच्या नादात पोलिस विभागाने चक्क न्यायालयासमोर आरोपीशी नावसाधर्म्य असलेल्या भलत्याच व्यक्तीला उभे केले.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु इच्छुकांची वाढलेली संख्या दोन्ही गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून उमेदवारी न मिळाल्यास काहींनी अपक्ष उभे राहण्याची तयारी सुरू केल्याचे कळते. सविस्तर वाचा…
राज्य सरकारच्या महाडीबीटी संकेतस्थळारील शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
निवृत्त लष्करी जवानाने कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्वरला धक्का लागल्याने झालेल्या गोळीबारात १३ वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला. धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली. याप्रकरणी जवानाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कल्याण : लोकलमधील वाढती गर्दी, प्रवाशाच्या पाठीवर असलेले पिशवीचे ओझे आणि डोंबिवली ते मुंब्रा नवीन रेल्वे मार्गाला असलेली वळणे ही लोकलच्या दरवाजात लोंबकळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यू कारणीभूत आहेत
नागपूरचे फुटपाथ मोकळे का नाही? उच्च न्यायालयाची महापालिका, पोलिसांना विचारणा…
नागपूर : नागपूरमध्ये फुटपाथवरून चालणे अत्यंत दुर्लभ गोष्ट झाली आहे. शहरातील फुटपाथ ही सार्वजनिक मालमत्ता असून खासगी कार्याकरिता यावर अतिक्रमण करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे कीकॉंट्रेक्टर मंत्री (CM) ने आवडत्या कॉंट्रेक्टर्सना कामं दिली आहेत. कॉंट्रेक्टर्स ने महापालिकेला लूटलं, पैसे काढले, पण कामं झालीच नाहीत!
आता महापालिकेची तिजोरी संपल्यावर... तीच तिजोरी भरण्याच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालणार आहेत! आणि ह्या जमिनी जाणार मात्र कमी किमतीत! म्हणजे गद्दार एकनाथ शिंदे ह्यांची मजा आणि मुंबईकरांना सजा!
तिजोरी रिकामी, जमिनी बिल्डरच्या घश्यात!
सूरतेच्या लूटीचा बदला, भाजप एकनाथ शिंदेंना हाताशी घेऊन घेत आहे!
कल्याण : (मोक्का) न्यायमूर्ती अमित शेटे यांनी कल्याण जवळील आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील चार सराईत गुन्हेगारांची मोक्का आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लवकरच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु इच्छुकांची वाढलेली संख्या दोन्ही गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता असून उमेदवारी न मिळाल्यास काहींनी अपक्ष उभे राहण्याची तयारी सुरू केल्याचे कळते. सविस्तर वाचा…
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि महायुतीतील भाजपला आपले संख्याबळ वाढविण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्याबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यात जिल्हा नेतृत्वासाठीही चढाओढ पाहण्यास मिळणार आहे. सविस्तर वाचा…
जिल्ह्यातील भंडारा आणि तुमसर या दोन विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, साकोली विधानसभेत आमदार नाना पटोले यांना तुल्यबळ लढत देऊ शकेल, असा उमेदवार भाजपला अद्यापतरी गवसलेला नसल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा…
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यंदाची विधानसभा निवडणूक घड्याळ की तुतारी, यापैकी कोणत्या चिन्हावर लढणार, याबाबत अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. त्यांच्या या ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिकेमुळे विरोधकांसह मित्रपक्षही बुचकळ्यात पडले असून सिंदखेड राजा मतदारसंघात संभ्रमावस्थेचे चित्र आहे. सविस्तर वाचा…
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयातील तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव यांच्यासह पत्नीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा…
चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होत आहे. मात्र, त्यावरून भाजपमध्ये अस्वस्थता असून, बुधवारी भाजपच्या १५ माजी नगरसेवकांनी बैठक घेऊन आक्रमक भूमिका घेतली. सविस्तर वाचा…
राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच सर्व कामकाज पहावे लागत आहे. सविस्तर वाचा…
समाजातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली. या आघाडीने २०१९ मध्ये लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करताना उमेदवारांच्या नावापुढे त्यांचा धर्म आणि जात देण्याचा प्रयोग राबविला. सविस्तर वाचा…
चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद गोवामार्गे मुंबईत पोहोचला आहे. चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केली आहे. सविस्तर वाचा…
अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून मिरजेतील माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून आमदारकीची संधी मिळाली असली तरी पक्षिय राजकारणात त्यांची ओळख राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विरोधक म्हणूनच आहे. सविस्तर वाचा…
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सरासरीच्या दीडपटीहून अधिक पाऊस नोंदला गेला असून यामुळे काढणीला आलेली खरीप पिके संकटात तर रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. तसेच थंडीचा हंगाम सुरू होऊनही पावसाचा मुक्काम कायम आहे. सविस्तर वाचा…
महायुती सरकारला ‘लाडकी बहीण योजने’चा फायदा होत असल्याचे लक्षात येताच आता महाविकास आघाडीकडूनही सत्तेत आल्यावर ही योजना बंद करणार नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा…
मुंबई : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट होत चालली असून महसूलवाढीचे नवा स्राोत नसल्यामुळे महापालिकेने वापरात नसलेले, पण मोक्याच्या जागेवरचे भूखंड भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला आहे
निवडणुकीसाठी काँग्रेसचा मध्यवर्ती अड्डा, मुंबई मुख्यालय ते बूथ थेट संपर्क.
वर्धा : प्रदेश काँग्रेस कार्यालयाने आता सेंट्रल चॅनल म्हणजेच मध्यवर्ती अड्डा तयार केला आहे. विधानसभा निवडणुकीत सक्षमपणे सुसंवाद साधण्यासाठी तो तयार करण्यात आल्याचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांना कळविले आहे.
संजय राऊत म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात संविधानविरोधी सरकार चालू आहे. हे सरकार रोज भ्रष्टाचार, अत्याचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायमूर्ती कुठलाही निकाल देण्यास हतबलता दर्शवतात. तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांबाबत, त्यांच्या चिन्हांबाबत निर्णय देऊ शकले नाहीत. हा आरएसएस व भाजपाचा अजेंडा आहे. तुम्ही एका पक्षाचा प्रचार करत आहात. ईव्हीएम संदर्भात घोटाळा होतो, परंतु, तुम्ही (सर्वोच्च न्यायालय) त्यांना क्लीन चीट दिली आहे. कायद्याचा वापर करून विरोधी पक्षाला संपवलं जात आहे आणि हे तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहात आहात हा प्रोपगंडा आहे.