Marathi News Live Update: लोकसभा निवडणुकांचा दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला असून तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी राजकीय नेतेमंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार गटाकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यात जातनिहाय जनगणनेचा उल्लेख करण्यात आला आहे. एकीकडे विरोधकांचे जाहीरनामे प्रकाशित होत असलाना सत्ताधारी गटाकडे नाशिकच्या जागेवर अद्याप सर्वमान्य उत्तर सापडलेलं नाही. त्यावरून सध्या तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.