कृषी कायद्यांना महाराष्ट्र सरकार विरोध करतं आहे. मात्र सरकारचा हा विरोध बेगडी आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अधिवेशनात झालेल्या सत्रात बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच हे कायदे झाले. महाराष्ट्रात हे कायदे आत्ताही लागू आहेत. इथे हे कायदे लागू असताना केंद्राच्या कायद्यांना विरोध का केला जातो आहे? असाही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. १७ टक्के दलाली न देता कृषी माल विकायचा अधिकार शेतकऱ्याला हवा. हा उल्लेख शरद पवार यांच्या आत्मचरित्रात आहे. शरद पवार यांची मागणी योग्यच होती त्याचा विचार करुनच मोदी सरकारने कायदे अमलात आणले आहेत. मात्र राजकीय विरोधासाठी विरोध केला जातो आहे. नवे कायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहेत. मग हे सरकार विरोध का दर्शवतं आहे? या सरकारचा विरोध हा बेगडी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा