सोलापूर : सुरुवातीला दोन नक्षत्र कोरडीच गेल्यानंतर पुनर्वसू नक्षत्राने चांगली साथ दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्यातील सर्व सहा मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापि अपुरा पाणीसाठा आहे. लघुपाटबंधारे तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांयांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. मागील १५ दिवसांत पुण्याच्या पश्चिम घाट परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात उणे १२.४८ टक्क्यांवरून उपयुक्त स्वरूपात असा ५६.९५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाणीसाठा मृत स्वरूपात म्हणजे उणे १२.४८ टक्के इतका खालावला होता. परंतु त्यानंतर भीमा खोऱ्यात सातत्याने दमदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत आहे. मागील १५ दिवसांत धरणात उणे १२.४८ टक्क्यांवरून उपयुक्त स्वरूपात ५६.९५ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा २६६६.७७ दललक्ष घनमीटर म्हणजे ९४.१७ टीएमसी एवढा आहे. तर उपयुक्त पाणीसाठा ८६३.९६ दलघमी म्हणजे ३०.५१ टीएमसी इतका आहे. धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसीपर्यंत आहे. पुण्याच्या बंडगार्डन व दौंडमार्गे उजनी धरणात २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

gold rates news in marathi
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात घसरण… परंतु थोड्याच वेळाने…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
Liquidity in the banking system fell to a 15 year low print eco news
बँकिंग व्यवस्थेतील तरलता १५ वर्षांच्या तळाला; उपायादाखल रिझर्व्ह बँकेकडून ६०,००० कोटींची लवकरच रोखे खरेदी
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
जीबीएसच्या रुग्णांत मोठी वाढ अन् एकाचा मृत्यू! रुग्णसंख्या शंभरपार; निम्म्याहून अधिक ‘आयसीयू’त
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?

तथापि, जिल्ह्यातील पाऊसमान गतवर्षांच्या तुलनेने सध्या कमीच आहे. त्यामुळे सर्व मध्यम प्रकल्पांसह लघुपाटबंधारे तलाव आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे.

Story img Loader