संगमनेर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची १२५ जागांवर सहमती झाली असून उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ते माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत दोन तीन बैठका झाल्या असून १२५ जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित जागांसाठी गणेशोत्सवानंतर बैठक होऊन सहमती होईल. समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण आहे. १८० पेक्षा जास्त जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Devendra Fadnavis Rebuttal to Sanjay Raut
“हिंदूत्त्वाला विरोध करता-करता..”, माजी सरन्यायाधीश आणि मनमोहन सिंग यांचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांची टीका
Ajit Pawar dilip mohite
Ajit Pawar : दिलीप मोहितेंना लाल दिव्याची गाडी देणार? आळंदीत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; जागावाटपावरही केलं भाष्य
Mamata Banerjee
Mamata Banerjee : “मला खुर्ची नको, राजीनामा द्यायला तयार”, आंदोलक डॉक्टरांनी चर्चेस नकार दिल्यानंतर ममता बॅनर्जींचं वक्तव्य
Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम
eknath khadse devendra fadnavis
Eknath Khadse : “फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन मला आश्वासन दिलेलं की…”, एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

आणखी वाचा- “हिंदूत्त्वाला विरोध करता-करता..”, माजी सरन्यायाधीश आणि मनमोहन सिंग यांचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांची टीका

महायुतीमध्ये सध्या फक्त मारामारी सुरू आहे. त्यांची दररोज भांडणे आपण पाहत आहोत. त्यांची आणि महाविकास आघाडीची तुलना नको असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात झालेली पक्ष फूट किंवा कुटुंबातील फूट ही राज्यातील जनतेला आवडली नसून लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय महायुतीला आला आहे.