नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले, अमरावती विभागात धिरज लिंगाडे, औरंगाबदमध्ये विक्रम काळे, नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि कोकणात बाळाराम पाटील असे पाच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच, पाचही जागा आम्ही जिंकू, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना नाना पटोले म्हणाले की, “केंद्र सरकारच्या ९ वर्षातील कार्यकाळात शेतकऱ्यांची गळचेपी झाली. तरुणांचं भ्रमनिरास करण्याचं काम झालं असून, बेरोजगारी वाढली आहे. जुनी पेन्शन योजना भाजपाच्या कोणत्याही राज्यात नाही. पण, राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचलमध्ये काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे तरुणांत भाजपाविषयी राग आहे, हे समोर येत आहे. जगात सर्वात मोठा पक्ष असल्याचं गवगवा करणाऱ्या भाजपाला नाशिकमध्ये उमेदवार मिळाला नाही,” असा टोला पटोलेंनी लगावला आहे.

Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Slogans raised against Kirit Somaiya Malegaon fake certificates Rohingya Bangladeshi infiltrators residents
मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना

हेही वाचा : पार्थ पवारांनी घेतली शंभूराज देसाईंची भेट, गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला; म्हणाले, “घरात आजोबांकडून…”

“नाशिकमध्ये भाजपाचा गोंधळ स्पष्ट होणार आहे. मागून वार करण्याची पद्धत महाराष्ट्रात आणली आहे. दुसऱ्यांचं घर फोडण्याचं काम भाजपा करत आहे. कोणत्या आधारावर ते घर फोडत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचं अनिल देशमुख प्रकरणातून स्पष्ट झालं आहे. अनिल देशमुखांवर १०० कोटींचा आरोप करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कुठं ठेवलं आहे,” असा सवाल नाना पटोलेंनी भाजपाला विचारला आहे.

Story img Loader